
तुमच्या देशाला विरांची आवश्यकता आहे. वीर बना. पर्वताप्रमाणे दृढ व्हा ! तुमचा निश्चय कधीही ढळू देऊ नका. ‘सत्यमेव जयते’ – सत्याचा सर्वदा विजय होतो. जी राष्ट्राच्या नसानसांतून नव्या उत्साहाचा संचार करील, अशा एका नव्या विद्युत्शक्तीची, एका नव्या सामर्थ्याची भारताला आवश्यकता आहे. शूर व्हा ! शूर व्हा !! माणूस तर एकदाच मरतो, माझ्या शिष्यांनी भित्रे होता कामा नये. मला भित्रेपणाची चीड येते. अगदी घोर आपत्तीतही मनाचा समतोल राहू द्या. क्षुल्लक पोरकट माणसे तुमच्याविरुद्ध काय म्हणतात, याकडे मुळीच लक्ष देऊ नका. उपेक्षा ! उपेक्षा ! उपेक्षा ! लक्षात असू द्या की, डोळे २ आहेत, कानही २ आहेत; पण तोंड मात्र एकच आहे. सर्व महान कार्ये ही पर्वतप्राय विघ्नांमधूनच साध्य होत असतात. आपले पौरुष आणि पराक्रम प्रकट करा. कामकांचनात जखडलेल्या क्षुल्लक लोकांकडे उपेक्षेच्या दृष्टीनेच बघितले पाहिजे.
(साभार : ‘स्वामी विवेकानंद म्हणतात’, रामकृष्ण मठ, नागपूर.)
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’त मोठा घोटाळा होऊनही प्रशासनाला तो कळत का नाही ?
हत्तींपासून जनतेचे रक्षण करू न शकणारे प्रशासन राज्य करण्याच्या लायकीचे आहे का ?
समष्टीसाठी सतत झटणारे सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ४९ वर्षे)!
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ घेत असलेल्या दिव्य भक्तीसत्संगाच्या माध्यमातून साधक अनुभवत असलेली सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची असीम कृपा !
‘स्वभावदोष न्यून होऊन आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी व्यष्टी साधनेलाच प्राधान्य द्यायला हवे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
चर्चासत्राच्या वेळी संगीत विभागातील साधकांनी अनुभवलेली गुरुकृपा आणि त्यांना आलेल्या अनुभूती !