हुब्बळ्ळी (कर्नाटक) येथे नेहा हिरेमठ हिला न्याय मिळण्यासाठी मोर्चा !

हुब्बळ्ळी (कर्नाटक) – नेहा हिरेमठ हत्या प्रकरण हा लव्ह जिहादचाच प्रकार असून काँग्रेस मतपेटीच्या राजकारणापायी हे सत्य नाकारत आहे. काँग्रेसचे नगरसेवक असलेले नेहाचे वडीलही या घटनेस ‘लव्ह जिहाद’ असे संबोधत आहेत. या प्रकरणी आरोपी फैयाज खोंडुनाईक याला फाशी द्यावी, अशी मागणी हिंदु राष्ट्र सेनेचे कर्नाटक राज्य अध्यक्ष श्री. संदीप गुरुजी यांनी केली. ‘नेहाला न्याय मिळाला नाही, तर राज्यभर तीव्र आंदोलने करण्यात येतील’, अशी चेतावणीही त्यांनी दिली. हिंदु राष्ट्र सेना आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्याकडून २६ एप्रिल या दिवशी येथे एक मोर्चा काढण्यात आला. यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
नेहा हिरेमठ हत्या प्रकरणाचे अन्वेषण सीबीआयकडे सुपुर्द करण्याची मागणी

नेहा हिरेमठ हिच्या हत्येनंतर संदीप गुरुजी आणि अन्य काही संत यांनी तिचे आई-वडील यांची भेट घेण्यासाठी हुब्बळ्ळी गाठले. या वेळी त्यांनी त्यांचे सांत्वन केले. त्यानंतर वरील मोर्चा आयोजित करण्यात आला होता. यासह दावणगेरे आणि कर्नाटकातील अन्य काही ठिकाणीही अशा प्रकारचे मोर्चे अन् भाषण यांचे आयोजन करून संदीप गुरुजी यांनी हिंदूंमध्ये जागृती करण्यासह कर्नाटकच्या काँग्रेस सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. हिंदूंच्या एकत्रित दबावामुळे या प्रकरणी जलदगती न्यायालयात हे प्रकरण चालवण्यात येण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. केंद्रीय अन्वेषण विभागाकडे याची चौकशी करण्यास कर्नाटक सरकारला भाग पाडले जाईल. नेहा हिरेमठ हत्या प्रकरणाचे अन्वेषण सीबीआयकडे सुपुर्द करण्याची मागणीही संदीप गुरुजी आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ यांनी केली आहे.
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न
Karnataka AI University : बेंगळुरूत देशातील पहिले ‘एआय’ विद्यापीठ चालू करणार !
Telangana AI Training : तेलंगाणातील काँग्रेस सरकार ८० सहस्र अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना एआय आणि डिजिटल सुरक्षा यांचे विनामूल्य प्रशिक्षण देणार !
९ ऑगस्टपूर्वीच श्रीकृष्ण मंदिराच्या बांधकामाचा दिनांक घोषित केला, तर कारसेवेची आवश्यकताच भासणार नाही ! – Kali Sena