मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या ७ धरणांत अल्प पाणीसाठा !

प्रतिकात्मक चित्र

मुंबई – मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या धरणांचा पाणीसाठा अल्प होत आहेत. उर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सातही धरणांमध्ये मिळून केवळ २७ टक्के पाणीसाठा आहे. हे पाणी जूनपर्यंतच पुरेल. यंदा पाऊस अल्प पडल्यास नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. मुंबईला या सात धरणांतून प्रतिदिन ३ सहस्र ९०० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा होतो.