आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांची टीका !

निर्मल (तेलंगाणा) – सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह काँग्रेसचे प्रमुख नेते यांना अयोध्येतील श्री रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे निमंत्रण होते. असे असतांनाही ते कार्यक्रमाला उपस्थित का राहिले नाहीत ? श्री रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला तुम्ही का गेला नाहीत ? तुमचे हिंदूंवर प्रेम नाही का ? तुम्ही सदैव ‘रझाकार’ (तत्कालीन हैदराबाद संस्थानच्या निजामाचे सैन्य) आणि बाबर यांच्याच पाठीशी उभे रहाणार आहात का ? देशवासी कधीही रझाकार आणि बाबर यांच्या पाठीशी उभे रहाणार नाहीत, अशा शब्दांत आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी काँग्रेसवर टीका केली. लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपच्या ‘विजय संकल्प यात्रे’च्या शुभारंभाच्या संदर्भात भैन्सा येथे एका जाहीर सभेत मुख्यमंत्री सरमा बोलत होते.
Assam CM Himanta Biswa's criticises !
Will the Congress government perpetually stand by Babar ?#HimantaBiswaSarma #Nirmal #Telangana pic.twitter.com/6nu3nWLWYy
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 21, 2024
मुख्यमंत्री सरमा पुढे म्हणाले की, जिथे राहुल गांधी यांची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ निघत आहे तिथे काँग्रेसची घसरण होत आहे. आता राहुल गांधी उत्तरप्रदेशात जाणार आहेत; पण समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्याशी त्यांचे मतभेद आहेत. न्याय यात्रा जिथे जाईल तिथे काँग्रेसवर ‘अन्याय’ होईल. राहुल गांधी खोटे बोलण्याखेरीज काहीही शिकलेले नाहीत.
“‘राहुल गांधी जेव्हा पहिल्यांदा भारत यात्रेवर होते, तेव्हा काँग्रेसचा ३ राज्यांतील निवडणुकांमध्ये पराभव झाला होता. लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस संपूर्ण देशात पराभूत होणार आहे. या निवडणुकीत काँग्रेसला ३० जागाही जिंकता येणार नाहीत !’ – मुख्यमंत्री सरमा “
केरळम्मधील ‘इंडियन युनियन मुस्लिम लीग’च्या पहिल्या महिला आमदाराने रेस्टॉरंटचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने केल्याने कट्टरतावाद्यांची टीका
भारतीय व्यापार्यांनी ‘हलाल अर्थव्यवस्थे’चा धोका ओळखून त्याला विरोध करणे आवश्यक !
२ सख्ख्या हिंदु बहिणींचा छळ करणार्या पसार आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद !
दुबईत नोकरी लावण्याच्या आमीषाने धर्मांधाकडून हिंदु शिक्षिकेवर अत्याचार : ६ तोळे सोने आणि लाखो रुपयांची लूट !
मुंबई विमानतळावर ५ कोटी रुपयांचे सोने जप्त, ७ जणांना अटक !
Bangladeshis At Hakimpur : हकीमपूर (बंगाल) येथील सीमेवर प्रतिदिन २०० ते ३०० बांगलादेशी परत जाण्यासाठी पोचत आहेत !