जालना – मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील २० जानेवारी या दिवशी अंतरवाली सराटीमधून मुंबईकडे निघाले आहेत. जरांगे यांनी मातोरी गावात मुक्काम केला. त्यानंतर जरांगे यांच्या पायी दिंडीचा दुसरा दिवस आहे. पायी दिंडीपूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, २६ जानेवारीच्या आधी सरकारने तोडगा काढावा. यावर तोडगा कसा काढता येईल ? हे पहावे. मराठा समाज मोठ्या संख्येने मुंबई येथे येणार आहे. आम्ही आमच्या मागणीवर ठाम आहोत. आमच्या नोंदी सापडल्या आहेत. त्यांना मराठ्यांची शक्ती पहायची असेल. मराठा समाजाचा हा शेवटचा लढा आहे. २ दिवस वाट पहाणार अन्यथा त्यांनी आमच्या गावात येऊ नये. सत्ता येत असते जात असते; मात्र दादागिरीची भाषा करू नका, अशी चेतावणी त्यांनी सरकारला दिली.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > स्थानिक बातम्या > सत्ता येत असते जात असते, दादागिरीची भाषा करू नका ! – मनोज जरांगे
सत्ता येत असते जात असते, दादागिरीची भाषा करू नका ! – मनोज जरांगे
नूतन लेख
- ध्वनीप्रदूषण करणार्या २० डॉल्बीचालकांच्या विरोधात गुन्हा नोंद !
- अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्या धर्मांधाला २० वर्षे सश्रम कारावास !
- सांगली येथे ‘हिट अँड रन’ प्रकरणात चारचाकी वाहनाने १० दुचाकी वाहने उडवली
- पुणे येथील श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीमध्ये ३०० भ्रमणभाष चोरीला !
- शिगांव (सांगली) येथील श्री बाल गणेश मित्र मंडळाची श्री गणेशमूर्तीची आदर्श मिरवणूक !
- जिजामाता जगन्मातेचा अंश असलेली सर्वश्रेष्ठ स्त्री ! – प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज