
तळेगाव दाभाडे (जिल्हा पुणे) – गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याच्या नावाखाली तळेगाव दाभाडे नगर परिषदेकडून कृत्रिम हौद, निर्माल्य संकलन, तसेच कलशांची उभारणी केली जाणार आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीत ‘स्वच्छ भारत अभियान’ आणि ‘माझी वसुंधरा’ या अभियानाची कार्यवाही प्रभावीपणे करणार असल्याची माहिती तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी एन्.के. पाटील यांनी दिली. यासह ‘श्री गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम हौदांमध्ये करावे’, असे आवाहनही पाटील यांनी भाविकांना केले.
पाटील पुढे म्हणाले की, निर्माल्य नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जित न करता ते ‘निर्माल्य कलश’मध्ये गोळा करावे. घरगुती आणि सार्वजनिक गणेशात्सव मंडळांचे निर्माल्य संकलनाकरता विसर्जनाच्या सर्व दिवशी शहरातून फिरत्या निर्माल्य कलशांची व्यवस्था केली आहे. संकलित होणार्या निर्माल्यातून सेंद्रीय खताची निर्मिती करण्यात येईल. सजावटीतील साहित्याची विल्हेवाट शास्त्रोक्त पद्धतीने करण्याचा आदेश संबंधितांना दिला आहे.
संपादकीय भूमिका
|
सातारा येथील महिमानगड होणार ‘राज्य संरक्षित स्मारक’ !
प्रस्तावित ‘देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियमा’विषयी देवस्थानांच्या शासनाकडून अपेक्षा !
थोडक्यात महत्त्वाचे (१५.०६.२०२६)
टिटवाळा येथे भूमाफियांच्या टोळीकडून वृद्धेच्या घरात घुसून तोडफोड !
नसरापूर खटल्याचा निकाल अंतिम टप्प्यात !
मंगळवेढ्यात खताच्या नावाखाली मिठाची विक्री !