‘एल् निनो’च्या प्रभावामुळे परतीचा पाऊस अल्प रहाणार !

छत्रपती संभाजीनगर – मराठवाड्यावर यंदाही पावसाअभावी पाणीटंचाईचे संकट असून विभागातील ८० पैकी ६१ मोठ्या शहरांना पाणीपुरवठा करणारे स्रोत डिसेंबर अखेर आटतील, असा अहवाल नगरपालिका आणि महापालिका यांनी दिला आहे. त्यामुळे ३ मासांनंतर या शहरांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. मराठवाडा हा परतीच्या पावसाचा प्रदेश आहे; मात्र ‘एल् निनो’च्या प्रभावामुळे यंदा परतीचा पाऊसही हुलकावणी देईल, असा अंदाज असल्याचे हवामानविषयक अभ्यासकांनी म्हटले आहे.

| उष्ण कटीबंधीय पॅसिफिकच्या विषुववृत्तीय प्रदेशात महासागरातील तापमान आणि वातावरणातील पालट यांसाठी उत्तरदायी असलेल्या सागरी घटनेला ‘एल् निनो’ म्हणतात. |
मराठवाड्यात ७ जून, २२ जुलै, तर ऑगस्टमध्ये केवळ ४ दिवस पाऊस झाला. त्यामुळे खेड्यापाड्यांसमवेतच नियोजित पाणीपुरवठ्याच्या सोयी असलेल्या शहरी भागांनाही तीव्र पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. शेवटच्या टप्प्यात मोठा पाऊस झाला नाही, तर ग्रामीण भागासमवेत शहरांनाही भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.
फिरोजाबाद (उत्तरप्रदेश) येथे उत्खननात सापडलेली २ सहस्र वर्षे जुनी नाणी मंदिरातून गायब !
हिंदूंच्या मागण्या शासनाकडे पोचवून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार ! – डॉ. अनिल बोंडे, खासदार, भाजप
Shivayogi Lohar Suspended : लव्ह जिहादचे प्रकरण दडपणारा पोलीस निरीक्षक निलंबित !
Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने पी.एफ्.आय.च्या ३ सदस्यांना जामीन नाकारला
विवाहानंतरही मुसलमान प्रियकराच्या संपर्कात असल्याने हिंदु युवतीची तिच्या भावानेच केली हत्या !
गेल्या १२ वर्षांत आरोग्यसेवा लोकांना परवडेल आणि सहज उपलब्ध होईल यांसाठी महत्त्वपूर्ण कार्य ! – PM Modi