
सातारा, ६ सप्टेंबर (वार्ता.) – पाळीव गुरांच्या मालकांनी शहरामध्ये मोकाट गुरे सोडल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
ते म्हणाले की, मुख्य रस्त्यांवर गाय, म्हैस, शेळी, गाढव अशी जनावरे मोकाट सोडली जात आहेत. यामुळे मुख्य रस्त्यांसह चौकाचौकांत वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. अनेक वेळा गुरांमुळे गंभीर अपघातही होत आहेत. मोकाट प्राण्यांमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून गुरे पाळणार्या नागरिकांनी जनावरे मोकाट सोडू नयेत. असे केल्यास महाराष्ट्र नगर परिषदा, नगरपंचायती आणि औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ चे कलम २८२ ते २९२ मधील तरतुदींनुसार कडक कार्यवाही होईल.
‘डिस्काऊंट’च्या (सवलतीच्या) मोहात आरोग्याचा सौदा !
बंगाल बोध : घुसखोरांना साहाय्य हा देशद्रोह नव्हे का ?
मोकाट कुत्र्यांना आवरा !
अनधिकृत इमारती बांधणारा मुसलमान बांधकाम व्यावसायिक २ वर्षांनंतर अटकेत !
कर्जत बाजारपेठेत फेरीवाल्यांचे अतिक्रमण; सर्वसामान्यांना त्रास
Bangladeshis At Hakimpur : हकीमपूर (बंगाल) येथील सीमेवर प्रतिदिन २०० ते ३०० बांगलादेशी परत जाण्यासाठी पोचत आहेत !