मुंबईची हवा श्‍वास घेण्‍याच्‍या योग्‍यतेची नाही ! – प्रजा फाऊंडेशन

मुंबईतील प्रदूषित हवा (प्रतिकात्मक चित्र)

मुंबई – मुंबई शहराची हवा श्‍वास घेण्‍याच्‍या योग्‍यतेची नाही, याविषयीच्‍या अनेक तक्रारी मुंबई महापालिकेकडे करण्‍यात आलेल्‍या आहेत, हे प्रजा फाऊंडेशनच्‍या अहवालातून उघडकीस आले आहे. मुंबई महापालिकेकडे कचर्‍याविषयीच्‍याही १२४ टक्‍के तक्रारी वाढलेल्‍या आहेत. कचरा उचलला जात नसल्‍याने दुर्गंधी पसरते. वर्ष २०१३ मध्‍ये या तक्रारी ५ सहस्र ५१९ होत्‍या, तर वर्ष २०२२ मध्‍ये हे प्रमाण १२ सहस्र ३५१ इतके होते.