
नागपूर, २१ डिसेंबर (वार्ता.) – बांगलादेशी घुसखोरांना स्थानबद्ध करण्यासाठी मुंबईत स्थानबद्धता केंद्र उभारण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २० डिसेंबर या दिवशी विधानसभेत दिली.
राज्यात अस्तित्वात असलेल्या कायद्यानुसार बांगलादेशी बंदीवानांना नियमितच्या कारागृहात ठेवता येत नाही. त्यामुळे बांगलादेशी घुसखोरांना कुठे ठेवावे ? याविषयी पोलिसांसमोर प्रश्न असतो. अशा प्रकारे स्थानबद्धता केंद्र बांधण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने जागा दिली आहे; मात्र ही जागा या निकषात बसत नाही. या स्थानबद्धता केंद्रासाठी मुंबई महानगरपालिकेकडून दुसरी जागा दिली जाणार आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. महाराष्ट्र कारागृहे आणि सुधार सेवा विधेयकावरील चर्चेच्या वेळी मुख्यमंत्र्यांनी वरील माहिती दिली.
स्थापनेनंतर १० वर्षांनी ‘महाआयटी’ने विधीमंडळात सादर केला पहिला वार्षिक अहवाल !
ठाणे येथे शाळेत प्रवेश देण्यासाठी लाच घेणार्या २ खासगी व्यक्ती कह्यात !
वटपौर्णिमेनिमित्त ठाणे जिल्ह्यातील श्री मलंगगडावर मलंगनाथांच्या समाधीची भक्तीभावाने आरती !
कुंभमेळा प्राधिकरणाच्या नावे ७० कोटी रुपयांचे बनावट कार्यआदेश; गुन्हे नोंद ! – एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
राज्यातील जनगणना पहिल्या टप्प्यातील माहिती संकलन १०० टक्के डिजिटल पद्धतीने पूर्ण ! – मुख्यमंत्री
महाराष्ट्रात अणूऊर्जा प्रकल्पासाठी सामंजस्य करार; मात्र अद्याप जागेची निश्चिती नाही !