
मुंबई, १७ एप्रिल (वार्ता.) – ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेची मर्यादा दीड लाख रुपयांवरून ५ लाख रुपयांपर्यंत करण्यात आल्याची घोषणा राज्याच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे; मात्र घोषणेला १ मास होऊनही शासन आदेश काढण्यात आलेला नाही. त्यामुळे या योजनेच्या अंतर्गत वाढीव निधीची तरतूद उपलब्ध झालेली नाही.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात ९ मार्च या दिवशी विधीमंडळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेची मर्यादा वाढवण्यात आली असल्याची घोषणा केली. आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी या योजनेतील निधी व्यय न होणारे २९६ रोग वगळून त्याऐवजी प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेतील रोगांचा समावेश करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती; मात्र अधिकृत शासन आदेशाअभावी राज्यात अद्याप याची कार्यवाही चालू झालेली नाही.
जलदगती न्यायालये स्थापन करण्याच्या पंतप्रधानांच्या निर्णयाचे स्वागत ! – डॉ. सावंत, मुख्यमंत्री
‘एकादश तीर्थयात्रा’ योजनेचा आजपासून खांडोळा येथून शुभारंभ होणार
‘मराठी अभ्यास केंद्रा’ची मराठी शाळांतील इंग्रजी बालवाड्यांविरुद्ध बैठक !
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून गोमांसाची तस्करी करणारे वाहन पकडले; दीड टन मांस जप्त
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन !
आजच्या थोडक्यात महत्त्वाच्या बातम्या (२४.७.२०२६)