गुढीपाडव्यानिमित्त सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा संदेश

‘भारताच्या इतिहासामध्ये सात्त्विक आणि पराक्रमी राज्यकर्त्यांचा काळ हा ‘सुवर्णकाळ’ म्हणून गणला जातो; पण या इतिहासाची दुसरी बाजू बघितली, तर त्यामध्ये पारतंत्र्याचा, म्हणजेच परकियांनी भारतावर राज्य केल्याचाही इतिहास आहे. रामायण काळात लंकेतील रावणाने भारताच्या काही भागावर राज्य केले. भारताला त्याच्या पारतंत्र्यातून सोडवण्यासाठी प्रभु श्रीरामाला अवतरावे लागले. गेल्या २००० वर्षांचा इतिहास बघता भारताच्या काही भागांवर ग्रीक, पोर्तुगीज, इंग्रज, डच आणि मुसलमान यांनी अधिक काळ राज्य केले. ‘समाजाचा क्षात्रभाव विलुप्त झाला की, परकीय साम्राज्यवादी शक्ती प्रबळ होतात आणि पारतंत्र्य येते’, हा जागतिक सिद्धांत आहे. अनेकदा हा परकियांचा साम्राज्यवाद क्षात्रभावहीन मानसिकतेच्या हिंदूंना पारतंत्र्यात ढकलणारा ठरला, हे हिंदू कधी शिकणार ? खरे तर पारतंत्र्यात ढकलणार्या साम्राज्यवाद्यांना पराजित करण्यासाठी आणि पुन्हा कधीही पारतंत्र्य येऊ नये, असे अजेय राष्ट्र भारताला बनवण्यासाठी हिंदु समाजाने स्वतःमध्ये लढाऊ वृत्ती जागृत करायला हवी !
म्हणून हिंदूंनो, शस्त्रधारी अन् दुष्ट शक्तींसाठी काळ ठरणार्या देवतांची उपासना केवळ भजन करून करू नका, तर त्यांच्यातील लढाऊ वृत्तीही अंगी बाणवून भारताला अजेय साम्राज्य बनवा !
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
बुद्धीच्या स्तरावर असलेले विज्ञान अन् बुद्धीपलीकडील अध्यात्म !
सतत आनंदी असलेल्या आणि नृत्यकलेप्रती समर्पणभाव असलेल्या मडगाव (गोवा) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (कु.) चांदणी आसोलकर (वय ३१ वर्षे) !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्या बार्शी (जिल्हा सोलापूर) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (श्रीमती) सुभद्रा ज्ञानोबा गोरे (वय ९२ वर्षे) !
व्यक्तीची आध्यात्मिक पातळी ५० टक्क्यांहून अधिक झाली की, तिच्या मनातील नकारात्मक विचार जाऊन तिची ईश्वराची ओढ वाढते !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘साधकांच्या त्रासांवरील उपाय शोधण्याच्या पद्धतीत होत गेलेले पालट’ या लिखाणाचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !