
मुंबई – धर्मवीर संभाजी महाराज यांनी धर्मासाठी बलीदान केले. औरंगजेबाने संभाजी महाराज यांचे हाल केले. त्यांच्या डोळ्यांत गरम सळ्या घुसवल्या. शरिराची त्वचा सोलली. धर्मांतरासाठी बळजोरी करूनही धर्मवीर संभाजीराजे यांनी हिंदु धर्म सोडला नाही. त्यामुळे अजित पवार यांनी धर्मवीर संभाजी महाराज यांच्याविषयी केलेले वक्तव्य त्यांना शोभणारे नाही, असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
या वेळी एकनाथ शिंदे म्हणाले, ‘‘धर्मवीर संभाजी महाराज यांनी धर्मासाठी केलेला त्याग कुणीही विसरू शकत नाही. अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याला जनताच उत्तर देईल. काही जण औरंगजेबाचे उदात्तीकरण करत आहेत. औरंगजेबाने काशी विश्वेश्वर मंदिर पाडले. हिंदूंच्या माता-भगिनींवर अत्याचार केले. धर्मवीर संभाजी राजांचा छळ केला, असे असतांना औरंगजेबाचे जाणीवपूर्वक उदात्तीकरण चालू आहे. समस्त शिवप्रेमी जनता याला उत्तर देईल.’’
‘म्हजे घर’च्या सर्व अर्जदारांना ६ महिन्यांत सनद मिळणार ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
खराडी (पुणे) येथे दिवाळखोर माहिती तंत्रज्ञान आस्थापनात नोकरी देऊन अनेकांची फसवणूक !
कला अकादमीच्या नूतनीकरणात १८ त्रुटी असल्याचा आय.आय.टी. मद्रासचा अहवाल
‘मराठा तितुका मेळवावा’ संघटनेच्या वतीने विशाळगड येथे शिवराज्याभिषेकदिन उत्साहात साजरा !
सिंहस्थ कुंभपर्वाची कामे वेळेत पूर्ण करावीत !
मुंब्रा येथे बनावट वैद्यकीय व्यवसाय करणार्यांवर कारवाई !