
नागपूर, २६ डिसेंबर (वार्ता.) – कोणत्याही परिस्थितीत आम्ही सीमाबांधवांना वार्यावर सोडणार नाही. महाराष्ट्राच्या इंच-इंच जागेसाठी लढू. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी आम्ही तसूभरही भागे हटणार नाही, अशी राज्यशासनाची भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २६ डिसेंबर या दिवशी विधानसभेत मांडली.
आम्हाला मान खाली घालावी लागेल, याची कुणाच्या बापात हिंमत नाही.
महाराष्ट्राच्या इंच न् इंच जागेसाठी लढू!
न्यायालयात सुद्धा भक्कम बाजू मांडू!
या प्रश्नावर महाराष्ट्र सरकार तसूभरही मागे हटणार नाही!
उद्या सभागृहात सीमाप्रश्नावर ठराव होईल.
(विधानसभा ।दि. 26डिसेंबर2022)#VeerBaal Diwas pic.twitter.com/jrjUQlC5kH— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 26, 2022
सभागृहाचे कामकाज चालू असतांना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी महाराष्ट्र-कर्नाटक राज्याच्या सीमाभागातील मराठी भाषिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहाण्याविषयी सभागृहात ठराव मांडण्याची मागणी करत चर्चेची मागणी केली. यावर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वीरदिनाच्या कार्यक्रमासाठी नवी देहली येथे गेले असल्यामुळे ‘ते आल्यावर २७ डिसेंबर या दिवशी हा ठराव मांडूया’, असे सांगितले. या वेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री वाट्टेल ते बोलत असतांना आपले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मात्र मान खाली घालून आहेत, असे वक्तव्य केले. यावर देवेंद्र फडणवीस यांनी ‘मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना मान खाली घालायला लावेल, अशी कुणाच्या बापाची हिंमत नाही’, असे उत्तर दिले.
मराठी पाठ्यपुस्तकांच्या संदर्भातील प्रादेशिक अस्मितेचे सूत्र निरर्थक ! – प्रा. सुभाष वेलिंगकर
मंदिर विश्वस्तांनी मंदिर परिसराचे पावित्र्य जपावे ! – गोमंतक मंदिर महासंघ
सिंधुदुर्ग जिल्ह्यात नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बसगाड्यांचे लोकार्पण
गावाचे शहरीकरण करण्याविषयी मत मागवणारे परिपत्रक गोवा सरकारने मागे घेतले !
हणजूण पंचायत क्षेत्राला ‘व्यावसायिक क्षेत्र’ घोषित करण्याची गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाची शिफारस
भिवंडी येथे गॅसच्या गोदामावर धाड !