
नागपूर, २६ डिसेंबर (वार्ता.) – कोणत्याही परिस्थितीत आम्ही सीमाबांधवांना वार्यावर सोडणार नाही. महाराष्ट्राच्या इंच-इंच जागेसाठी लढू. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी आम्ही तसूभरही भागे हटणार नाही, अशी राज्यशासनाची भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २६ डिसेंबर या दिवशी विधानसभेत मांडली.
आम्हाला मान खाली घालावी लागेल, याची कुणाच्या बापात हिंमत नाही.
महाराष्ट्राच्या इंच न् इंच जागेसाठी लढू!
न्यायालयात सुद्धा भक्कम बाजू मांडू!
या प्रश्नावर महाराष्ट्र सरकार तसूभरही मागे हटणार नाही!
उद्या सभागृहात सीमाप्रश्नावर ठराव होईल.
(विधानसभा ।दि. 26डिसेंबर2022)#VeerBaal Diwas pic.twitter.com/jrjUQlC5kH— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 26, 2022
सभागृहाचे कामकाज चालू असतांना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी महाराष्ट्र-कर्नाटक राज्याच्या सीमाभागातील मराठी भाषिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहाण्याविषयी सभागृहात ठराव मांडण्याची मागणी करत चर्चेची मागणी केली. यावर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वीरदिनाच्या कार्यक्रमासाठी नवी देहली येथे गेले असल्यामुळे ‘ते आल्यावर २७ डिसेंबर या दिवशी हा ठराव मांडूया’, असे सांगितले. या वेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री वाट्टेल ते बोलत असतांना आपले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मात्र मान खाली घालून आहेत, असे वक्तव्य केले. यावर देवेंद्र फडणवीस यांनी ‘मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना मान खाली घालायला लावेल, अशी कुणाच्या बापाची हिंमत नाही’, असे उत्तर दिले.
थोडक्यात महत्त्वाचे : ०६.०६.२०२६
‘श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसर विकास आराखड्या’तील १३६ जागांचे सर्वेक्षण पूर्ण ! – डॉ. विजय राठोड, जिल्हाधिकारी, कोल्हापूर
हिंजवडी ‘आयटी पार्क’ मधील ‘थिंकटेक इंडिया’ आस्थापन रातोरात बंद !
आरे परिसरातील ८० एकर जागेत ५ लाख वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ !
श्री महालक्ष्मीदेवी मंदिरासह परिसरातील गड-दुर्ग यांना एकत्र करून ‘टुरिस्ट सर्किट’ करणार ! – शंभूराज देसाई, खनिजकर्ममंत्री
महिला पर्यटकांचे व्हिडिओ काढणार्याला अटक