पेढी (जिल्हा यवतमाळ) येथे गोवंशियांच्या तस्करीचे प्रमाण वाढले !

पेढी (यवतमाळ), २९ नोव्हेंबर (वार्ता.) – तालुक्यातील पेढी हे गाव गोवंशियांच्या तस्करीचे केंद्र झाले आहे. येथून गायी आणि बैल यांना निर्दयीपणे कोंबून भाग्यनगर येथे कत्तलीसाठी त्यांची तस्करी केली जाते. यामुळे या परिसरात गोवंशियांच्या चोरीचे प्रमाण वाढले आहे आणि त्यातूनच त्यांच्या तस्करीचे प्रमाण वाढत आहे. (पोलिसांच्या कामचुकार आणि भ्रष्टाचारी वृत्तीवर वरिष्ठांनी कारवाई करावी ! – संपादक)

संपादकीय भूमिका 

पोलिसांची निष्क्रीयताच गोवंशियांच्या वाढत्या तस्करीला कारणीभूत !