पाण्याऐवजी सरबत प्यावे का ?

निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक ९६

संग्रहित चित्र
वैद्य मेघराज पराडकर

‘कधीतरी गंमत म्हणून सरबत प्यायल्यास चालते; परंतु प्रतिदिन सरबत पिण्याची सवय आरोग्याला चांगली नसते. सरबतातून अनावश्यक साखर पोटात जाते. साखर आरोग्याला हानीकारक असते. साखरेऐवजी गूळ घातला, तरी गूळही अधिक प्रमाणात प्रतिदिन खाणे योग्य नसते. गुळाचे पदार्थ वारंवार खाल्ल्याने प्रतिदिन ते पदार्थ खाण्याची इच्छा होत रहाते. त्यामुळे सरबताऐवजी साधे पाणीच प्यावे.’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.११.२०२२)