|

नाशिक – नाशिक येथे गेल्या ५ वर्षांत १० सहस्र १४ घटस्फोट झाले आहेत. घटस्फोटासाठी प्रतिदिन कौटुंबिक न्यायालयात १० अर्ज येत आहेत. घटस्फोटांचे प्रमाण तरुणाईसाठीच नाही, तर अनेक कुटुंबांसाठी चिंतेची गोष्ट ठरत आहे. घटस्फोटामागे मुख्य कारण भ्रमणभाष (मोबाईल) हेच आहे. ‘व्हॉट्सॲप’सह इतर सामाजिक माध्यमांमुळे पत्नी-पत्नी यांच्यातील वाढत जाणारी भांडणे, आर्थिक आणि कौटुंबिक वाद, नोकरी जाणे आणि वेतन अल्प असणे आदी गोष्टीही घटस्फोटासाठी कारणीभूत ठरत आहेत.
नाशिक शहरात वर्ष २०१८ ते ऑक्टोबर २०२२ या ५ वर्षांच्या काळात ६ सहस्र ६३८ एवढे घटस्फोटांचे दावे कौटुंबिक न्यायालयात प्रविष्ट झाले आहेत. त्यापैकी ५ सहस्र ४६० दावे निकाली निघाले आहेत. निकाली निघालेल्या दाव्यातील तब्बल १० सहस्र १४ जोडप्यांचे घटस्फोट झाले आहेत, तर फक्त १ सहस्र ९७४ जोडप्यांची मने जुळली असून घटस्फोटांच्या तुलनेत हे प्रमाण पुष्कळ अल्प आहे.
संपादकीय भूमिकापती-पत्नीने धर्माचरण केल्यासच कुटुंबव्यवस्था अबाधित राहील आणि घटस्फोटांचे प्रमाण न्यून होईल ! |
ढवळी परिसरात बिबट्याचे आक्रमण
मळेवाड येथे बिबट्याच्या आक्रमणात वासराचा मृत्यू
गोव्यातील ५६ गावांच्या शहरीकरणाच्या अधिसूचनेला विरोध
अत्याचार केल्याप्रकरणी धर्मांधाला सश्रम कारावास आणि दंड !
आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज
पक्षातील एकही खासदार फुटणार नसल्याचा शरद पवार यांना विश्वास !