|

शोपिया (जम्मू-कश्मीर) – येथील चौधरी गुंड भागामध्ये पूरण कृष्ण भट या काश्मिरी हिंदूची जिहादी आतंकवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. भट हे याच भागातील रहिवासी होते. ते त्यांच्या बागेकडे जात असतांना त्यांच्यावर आतंकवाद्यांनी गोळीबार केला. यात घायाळ झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात नेत असतांना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. या हत्येनंतर सुरक्षादलांकडून संपूर्ण परिसराला घेराव घालून शोध मोहीम राबवण्यात येत आहे. या हत्येनंतर राज्यातील काश्मिरी हिंदूंकडून रस्त्यावर उतरून राज्य प्रशासन आणि केंद्र सरकार यांच्या विरोधात निदर्शने केली जात आहेत.
Kashmiri Pandit shot dead by terrorists in Jammu and Kashmir’s Shopianhttps://t.co/OWb2Sd4DFC
— OpIndia.com (@OpIndia_com) October 15, 2022
१. काश्मिरी पंडित संघर्ष समितीने ट्वीट करून संताप व्यक्त करतांना लिहिले आहे की, काश्मीरमध्ये काहीही पालट झालेला नाही. ‘काश्मीरमधील परिस्थिती वर्ष १९९० सारखी आहे’, असा हा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना संदेश आहे.
२. समितीने आणखी एका ट्वीटमध्ये आरोप केला आहे की, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक हे पूरण भट यांच्या पार्थिवावर लवकरात लवकर अंत्यसंस्कार करण्यासाठी त्यांच्या कुटुंबावर दबाव निर्माण करत आहेत; कारण त्यांना काश्मीर खोर्यात शांतता असल्याचे दाखवायचे आहे.
३. काश्मिरी हिंदू असलेल्या सरकारी कर्मचार्यांनी या हत्येच्या विरोधात जम्मूमधील कॅनॉल रोड रोखून निषेध केला. ते म्हणाले की, खोर्यातील परिस्थिती सामान्य नसल्याचे आम्ही सरकारला वारंवार सांगितले आहे; मात्र तरीही ठोस कारवाई होत नाही. आम्ही जवळपास ५ मासांपासून आंदोलन करत आहेत आणि आम्हाला काश्मीर बाहेर स्थानांतर करण्याची मागणी करत आहेत; परंतु आमच्या मागण्यांकडे वारंवार दुर्लक्ष केले जात आहे.
४. यापूर्वीच ऑगस्ट मासामध्ये सफरचंदाच्या बागेमध्ये जिहादी आतंकवाद्यांनी काश्मिरी हिंदू सुनीलकुमार भट यांची हत्या केली होती. या हत्येचे दायित्व काश्मीरमधील जिहादी आतंकवादी संघटना ‘कश्मीर फ्रिडम फायटर्स’ ने घेतली होती. सुनीलकुमार भट तिरंगा यात्रेत सहभागी झाल्याने त्यांची हत्या करण्यात आल्याचे या संघटनेने म्हटले होते.
संपादकीय भूमिका
|
पंढरपूर येथे होणार्या वारकरी महाअधिवेशनाच्या निमित्ताने विविध संत, कीर्तनकार, मंदिरांचे प्रमुख यांना निमंत्रण आणि भेटी !
आतंकवादाविषयी शून्य सहनशीलतेचे धोरण आवश्यक !
आम्ही सरकारकडे ३ मागण्या केल्या !
भारत-नेपाळ सीमेवरून प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार्या खलिस्तानी फुटीरतावाद्याला अमेरिकी नागरिकासह अटक
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान त्यागपत्र देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन चालूच रहाणार !
Sonia Gandhi INC : (म्हणे) ‘मोदी सरकार आंदोलक विद्यार्थ्यांना ‘राष्ट्राचे शत्रू’ मानते !’