
मुंबई – गोवा आणि उत्तराखंड येथे समान नागरी कायदा आहे. महाराष्ट्रातही समान नागरी कायदा आणण्याचा प्रयत्न केला जाईल. प्रत्येक राज्य तसा प्रयत्न करेल. तो आला पाहिजे आणि येईल. राज्यघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वामध्ये तसे आहे, असे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. लोकमत वृत्तपत्राच्या व्यासपिठावर अभिनेते नाना पाटेकर यांनी त्यांची मुलाखत घेतली, त्या वेळी ते बोलत होते. लोकसंख्या नियंत्रण वाढीविषयी बोलतांना फडणवीस म्हणाले की, भारतीय पद्धतीने आपल्याला या प्रश्नाचा विचार करावा लागेल. अन्य देश लोकसंख्येवर नियंत्रण ठेवत आहेत. हे करत असतांना लोकसंख्येचा ढाचा पालटणार नाही किंवा ती एकतर्फी होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. लोकसंख्या नियंत्रणासाठी कायदा आणला पाहिजे, असे माझे मत आहे.
नागपूर येथे हिंदु महिलेच्या धर्मांतराचा प्रयत्न; दर्ग्याच्या बाबासह ६ जणांवर गुन्हा नोंद !
तळलेल्या वाटाण्यात कृत्रिम रंगाचा वापर होत असल्याने अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई !
राष्ट्र आणि धर्मनिष्ठ युवा निर्मितीसाठी सज्जनगड येथे पार पडले ‘हिंदु धर्मसंस्कार शिबीर’
महाराष्ट्र शासनाने ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ त्वरित रहित करावा – अधिवक्ता श्री. विश्वास पानसे, प्रमुख विश्वस्त, मार्तंड देवस्थान, जेजुरी
‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ कायदा रहित करा ! – महाराष्ट्र मंदिर महासंघाचे ठिकठिकाणी निवेदन