मुंबई – गोवा आणि उत्तराखंड येथे समान नागरी कायदा आहे. महाराष्ट्रातही समान नागरी कायदा आणण्याचा प्रयत्न केला जाईल. प्रत्येक राज्य तसा प्रयत्न करेल. तो आला पाहिजे आणि येईल. राज्यघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वामध्ये तसे आहे, असे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. लोकमत वृत्तपत्राच्या व्यासपिठावर अभिनेते नाना पाटेकर यांनी त्यांची मुलाखत घेतली, त्या वेळी ते बोलत होते. लोकसंख्या नियंत्रण वाढीविषयी बोलतांना फडणवीस म्हणाले की, भारतीय पद्धतीने आपल्याला या प्रश्नाचा विचार करावा लागेल. अन्य देश लोकसंख्येवर नियंत्रण ठेवत आहेत. हे करत असतांना लोकसंख्येचा ढाचा पालटणार नाही किंवा ती एकतर्फी होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. लोकसंख्या नियंत्रणासाठी कायदा आणला पाहिजे, असे माझे मत आहे.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > राज्यस्तरीय बातम्या > महाराष्ट्रातही समान नागरी कायदा येईल ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
महाराष्ट्रातही समान नागरी कायदा येईल ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
नूतन लेख
पावसामुळे १०वी आणि १२वीच्या परीक्षेच्या वेळापत्रकांमध्ये पालट !
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’तील काही महिलांना वर्षाला ३ गॅस सिलिंडर विनामूल्य मिळणार !
पितांबरी उद्योग समुहाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांना ‘सार्वजनिक काका’ पुरस्कार !
संपूर्ण जगाला तारणार्या हिंदु धर्माचे रक्षण होणे आवश्यक ! – प्रा. विनायक (श्याम) देशपांडे, अध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर सामाजिक सेवा समिती, वर्धा
महाराष्ट्रात गणेशोत्सवानिमित्त मिळणार ‘आनंदाचा शिधा’ !
भारत पुन्हा विश्वगुरु झाला पाहिजे ! – भार्गवश्री बी.पी. सचिनवाला