…म्हणून गरबा नृत्य आणि नमाजपठण यांची तुलना कधीच होऊ शकणार नाही !

नुकत्याच पार पडलेल्या नवरात्रोत्सवाच्या आनंदात संपूर्ण भारतासह जगभरातील हिंदू न्हाऊन निघाले आहेत. अनेक देशांत, अन्य धर्मियांमध्ये स्त्रियांवर शेकडो बंधने असतांना, त्यावरून कुठे आंदोलन, तर कुठे हिंसाचार चालू असतांना, स्त्रीशक्तीला देवी भगवतीचे स्वरूप मानून साजरा होणारा नवरात्रोत्सव हिंदु धर्माने मानवतेला दिलेली देणगीच ! स्त्रीला अबला समजून तिला जाचक धार्मिक कायद्यांत अडकवून तिचे शोषण करणार्‍यांसमोर ‘दैत्यविनाशिनी’ म्हणून नवरात्र आणि नंतरच्या विजयादशमीला पूजणाराही हिंदु धर्मच ! याच नवरात्रोत्सवात स्त्रीशक्तीचे पूजन करतांना हिंदु धर्मीय सहस्रो वर्षांपासून ठिकठिकाणी दांडिया आणि गरबा नृत्य यांचे आयोजन करतात. इतकेच नव्हे, तर नवरात्रोत्सवाचा आनंदच इतका असतो की, अनेकदा वेळ आणि सवंगडी जमले की, दांडिया, गरबा नृत्य हव्या त्या ठिकाणीही चालू होते. ते त्यात सहभागी होणार्‍यांसह आजूबाजूच्यांनाही एक वेगळीच अनुभूती देते.

प्रतिकात्मक छायाचित्र

१. रेल्वेमध्ये हिंदु महिलांनी गरबा नृत्य केले; म्हणून धर्मांधांनी त्याला विरोध करणे

असे असले, तरी त्यावरूनही खुसपट काढणारे, त्याला विरोध करणारे, विघ्नसंतोषी लोक असतातच. घटना मुंबईतील असून  मुंबईची जीवनवाहिनी म्हटल्या जाणार्‍या लोकल रेल्वेमध्ये हिंदु महिलांनी गरबा नृत्य केले. त्याची चित्रफीत समाजमाध्यमांवर वेगाने ‘व्हायरल’ (प्रसारित) होत आहे. त्यावर ‘लाईक’ (आवडले) असे सांगत गरबा नृत्याचे कौतुक केले जात आहे. अर्थात् आपल्या देशाचा प्राण या संस्कृतीतच आहे. ही संस्कृतीच प्रतिदिनच्या जगण्यात आपल्याला पुढे घेऊन जात असते, आपल्या जगण्याला प्रेरणा देत असते, ती सर्वांना आवडणारच !

स्वतःला ‘भारतीय’ म्हणवून घेत असले, तरी आपल्या देशाच्या संस्कृतीशी एकरूप न झालेले डावे, समाजवादी आणि धर्मांध यांचे टोळके सतत या संस्कृतीला अन् सण-उत्सवांना विरोध करण्याचे काम करत असते. त्यातही मुसलमानांकडून नेहमीच ‘गंगा-जमुनी तहजीब’चा (गंगा आणि यमुना या नद्यांच्या तिरांवर वास्तव्य करणार्‍या हिंदू अन् मुसलमान यांच्यातील कथित ऐक्य दर्शवणारी संस्कृती) उल्लेख करून आपणही या देशाच्या सामाजिकतेत, धार्मिकतेत समरस झाल्याचे दावे केले जातात; पण ते खरेच तसे असतात का ? कि फक्त स्वतःचे काम भागवण्यासाठी तसे म्हटले जाते ? लोकल रेल्वेमधील हिंदु महिलांच्या गरबा नृत्याला धर्मांधांकडून होत असलेल्या विरोधाने तर त्यांच्याकडून केल्या जाणार्‍या दाव्यांची पुरती पोलखोल झाल्याचेच दिसते.

२. धर्मांधांनी गरबा नृत्याची तुलना नमाजपठणाशी करणे चुकीचे असणे

यातील एक निराशाजनक मुद्दा, म्हणजे गरबा नृत्यही सहन न होणार्‍या धर्मांधांचे सणवार हे पुरोगामित्व, धर्मनिरपेक्षता, उदारमतवादाचे खूळ संचारलेल्या हिंदूंकडूनच मंदिरांत वगैरे साजरे केले जातात वा इफ्तारच्या मेजवान्याही दिल्या जातात. पुरोगामित्व, धर्मनिरपेक्षता, उदारमतवादाचा आरडाओरडा करणार्‍यांकडून कधी मशिदीत हिंदूंचे सणवार साजरे का केले जात नाहीत ? किंवा ‘त्या विचारांचे आहोत’, असे म्हणणारे मुसलमानही कधी त्यासाठी पुढाकार का घेत नाहीत ? उलट तसे न होता आता लोकल रेल्वेमध्ये हिंदु महिलांनी गरबा नृत्य केले, तर त्याची तुलना थेट प्रत्येक शुक्रवारी वाहतूक अडवून रस्त्यावर पढल्या जाणार्‍या नमाजपठणाशी करण्यापर्यंत धर्मांधांची मजल गेली.

३. लोकल रेल्वेमध्ये गरबा नृत्य करणार्‍या महिलांवर गुन्हा नोंदवण्याची मागणी धर्मांधांनी करणे

‘हिंदु महिलांनी लोकल रेल्वेमध्ये गरबा नृत्य केले, तर त्यांना कुणीही अटक केली नाही. त्यांना कुणीही ‘धर्मांध’ म्हटले नाही. त्यांना कुणीही ‘जिहादी’ म्हटले नाही. त्यांना कुणीही ‘आतंकवादी’ म्हटले नाही. मग आम्हीच रस्त्यावर वा मॉलमध्ये किंवा रुग्णालयात अथवा विमानतळावर, मोकळ्या सार्वजनिक जागेवर नमाजपठण केले, तर आम्हाला विरोध का केला जातो ?’,

असा प्रश्न धर्मांधांकडून विचारला जात आहे. तसेच आता ‘लोकल रेल्वेमध्ये गरबा नृत्य करणार्‍या महिलांवर गुन्हा नोंदवून त्यांना शिक्षा केली जावी’, अशी मागणीही धर्मांधांकडून केली जात आहे. खरे म्हणजे अशी मागणी करणार्‍यांना गरबा नृत्य आणि नमाज यांमध्ये समानता दिसली, हीच हास्यास्पद गोष्ट ! कारण नमाज मुसलमानांचा अत्यावश्यक धार्मिक विधी आहे.

४. रेल्वेत गरबा नृत्य होत असतांना कुणालाही असुरक्षित न वाटणे; पण रस्त्यावर नमाजपठण केल्यावर भीती वाटणे

संबंधित महिला लोकल रेल्वेमध्ये पूजा-पाठ, होम-हवन काहीही करत नव्हत्या, तर त्या फक्त गरबा नृत्य करत होत्या. त्यात लोकल रेल्वेमधील अन्य प्रवासीही तल्लीन होत, त्यांच्या आनंदात सहभागी झाल्याचे आणि त्यांना प्रोत्साहन देत असल्याचे दिसते. तिथल्या कुणालाही गरबा नृत्य चालू झाले म्हणून असुरक्षित वा भीती वाटली नाही; पण तसे रस्त्यावर वा इतर सार्वजनिक ठिकाणी नमाजपठण करणार्‍यांविषयी वाटत नाही. महत्त्वाचे म्हणजे रस्त्यावर वा रेल्वेस्थानकावर कुणी नमाजपठणाला प्रारंभ केला की, नंतर ती जागाच बळकावण्यासारखे उद्योग गरबा नृत्य करणार्‍या महिलांकडून केले जात नाहीत.

५. मुसलमानांनी रस्ता, रेल्वेस्थानक, मॉल वा अन्य सार्वजनिक ठिकाणी नमाजपठण केल्यावर ती जागा त्यांनी अवैधरित्या बळकावल्याची अनेक उदाहरणे आढळणे

देशात वर्षानुवर्षांपासून आणि आताही एखाद्या ठिकाणी अचानक दर्गा, मजारी, मशीद वगैरे उभी रहाते. त्याआधी त्या ठिकाणी कुणी तरी मुसलमान समुदायातील लोक नमाजपठणाचे काम करत असतात. नंतर तिथे मुसलमानांचे धार्मिक विधी होत असल्याने ‘ती जागा आम्हालाच मिळायला हवी’, असे म्हणत ती कह्यात घेतली जाते. असे अनेक अवैध दर्गे, मजारी, मशिदी कित्येक ठिकाणी दिसून येतात. त्याचे अगदी अलीकडचे उदाहरण म्हणजे कर्नाटकच्या बेंगळुरू आणि हुबळी येथे ईदला नमाजपठणासाठी भाड्याने मिळालेल्या सार्वजनिक मैदानावर मुसलमानांनी हक्क सांगत तिथे होणार्‍या गणेशोत्सवाला विरोध केला. त्यापैकी हुबळीमधील मैदानात गणेशोत्सव झाला; पण बेंगळुरूमध्ये झाला नाही. इथे तरी निदान कायद्याच्या चौकटीत राहून पुढची कार्यवाही झाली; पण इतरत्र बर्‍याच ठिकाणी तसे होत नाही अन् मुसलमानांकडून जागा बळकावून आपल्या धार्मिक स्थळांची उभारणी केली जाते; म्हणूनच मुसलमानांकडून रस्ता, रेल्वेस्थानक, विमानतळ, रुग्णालय, मॉल वा अन्य सार्वजनिक ठिकाणी पढल्या जाणार्‍या नमाजपठणाला विरोध केला जातो.

लोकल रेल्वेमध्ये गरबा नृत्य करणार्‍या महिलांनी तसे काही केलेले नाही वा आतापर्यंत गणेशोत्सव, नवरात्रोत्सव साजरा करणार्‍या मंडळांनीही कधी सार्वजनिक जागेवर दावा सांगितलेला नाही. त्यामुळे गरबा नृत्य आणि नमाजाचीही कधीच तुलना होऊ शकणार नाही. तसेच कुणालाही त्रास न होणार्‍या गरबा नृत्यालाही कुणी रोखू शकणार नाही.

(साभार : दैनिक ‘मुंबई तरुण भारत’, ४.१०.२०२२)