येत्या १५ दिवसांत तब्येतीची विशेष काळजी घ्या !

वैद्य परीक्षित शेवडे

काय घडणार आहे ?

वर्षा ऋतूमधून शरद ऋतूत वाटचाल होण्याचा काळ. यालाच ऋतुसंधी असे म्हणतात.

कोणते त्रास वाढतील ?

दमा, सांधेदुखी, आमवात, आत्मप्रतिरक्षा रोग (ऑटोइम्युन डिसीज – Autoimmune Conditions), अम्लपित्त, शीतपित्त, पचनाचे ज्ञात त्रास, कोणतीही साथ असल्यास संसर्ग होण्याची शक्यता अधिक आहे.

काय काळजी घ्याल ?

नियमित आणि पुरेसे जेवण, झोप. आहारात बेसन, मैदा, हिरवी मिरची, विरुद्ध आहार, मांसाहार, मसालेदार पदार्थ शक्य तितके टाळावेत. आवश्यकता भासल्यास वेळ न दवडता लगेच आपल्या वैद्यांचा सल्ला घ्यावा.

– वैद्य परीक्षित शेवडे, आयुर्वेद वाचस्पती, डोंबिवली (२१.९.२०२२)