देशभरातील सर्व मदरशांचे सर्वेक्षण झाले पाहिजे ! – अभय वर्तक, धर्मप्रचारक, सनातन संस्था

श्री. अभय वर्तक

अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या आतंकवादी आक्रमणाच्या प्रकरणी सत्यशोधन समितीने केलेल्या अभ्यासात आतंकवादी आक्रमणाचा संबंध मदरशांशी आढळून आला आहे. आसाम राज्यातही काही मदरशांचे संबंध हे ‘अल्-कायदा’ या आतंकवादी संघटनेशी उघड झाल्यावर ते पाडले . तेथील मुख्यमंत्र्यांनी मदरशांविषयी नवीन कायदा करून त्यांचे शाळेत रूपांतर केले आहे. खरे तर याचे देशातील सर्व राज्य सरकारांनी अनुकरण केले पाहिजे. देशात अनधिकृत मदरशांची संख्या कितीतरी पटींनी अधिक असेल. उत्तरप्रदेशमधील मदरशांचे ‘डिजिटलायजेशन’ केल्यावर तेथे १०० कोटी रुपयांचा अपहार झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे देशभरातील सर्व मदरशांचे सर्वेक्षण झाले पाहिजे.