राहुल गांधी यांच्या भेटीत पाद्री जॉर्ज पोन्नैया यांचे आक्षेपार्ह विधान !

कन्याकुमारी (तमिळनाडू) – काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेसाठी कन्याकुमारीमध्ये असतांना कॅथॉलिक पादरी जॉर्ज पोन्नैया यांची भेट घेतली. या भेटीचा एक व्हिडिओ प्रसारित झाला आहे. त्यात राहुल गांधी त्यांना विचारतात, ‘येशू हेच देवाचे रूप आहेत, हे सत्य आहे का?’ पादरी पोन्नैया राहुल गांधी यांना सांगत आहेत, ‘येशू ख्रिस्त हेच एकमेव भगवान आहेत. इतर कोणतेही देवता किंवा देवी (शक्ति) नाहीत.’ त्यांच्या या विधानावर टीका होत आहे. गेल्या वर्षी जुलै मासामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात द्वेषपूर्ण विधाने केल्याने पाद्री पोनैया यांना अटकही झाली होती.
#TamilNadu | ‘#JesusChrist Is The Real God’: Row Over Pastor’s Conversation With #RahulGandhi ;BJP Says Congress Promoting ‘Bharat Todo’ Campaign#BharatJodoYatra #BJP #Congress #Indiahttps://t.co/E4jG3IRsLQ
— India.com (@indiacom) September 10, 2022
१. या व्हिडिओवर भाजपकडून टीका केली जात आहे. भाजपचे प्रवक्ते शहजाद पुनावाला यांनी म्हटले आहे की, हे काँग्रेसचे ‘भारत जोडो’ अभियान नसून ‘नफरत (द्वेष) जोडो’ अभियान आहेे. पोन्नैया यांनी हिंदूंच्या देवतांचा अपमान केला असून यापूर्वी भारतमातेविषयी अयोग्य विधाने केली आहेत. या भेटीतून काँग्रेसचे विचार आणि तिची हिंदूविरोधी भूमिका दिसून येते. काँग्रेस हिंदूविरोधी असल्याचा इतिहास आहे.
२. भाजपच्या टीकेवर काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी म्हटले की, त्या व्हिडिओत जे आहे, त्याचा पक्षाशी संबंध नाही. ‘भारत जोडो’ यात्रेला मिळत असलेल्या प्रतिसादामुळे भाजपवाले बिथरले असून खालच्या दर्जाचे राजकारण करत आहेत.
संपादकीय भूमिका
|
Andaman Natural Gas :अंदमान ‘शॅलो ऑफशोर ब्लॉक’मध्ये सापडला नैसर्गिक वायूचा दुसरा मोठा साठा
Mumbai Hub Of Bangladeshi Infiltrators : मुंबई बांगलादेशी घुसखारांचे केंद्र : १ सहस्र ५०० हून अधिक ठिकाणी घुसखोरांचे अड्डे !
Temple Land Protection Movement : ‘देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ला स्थगिती !
Bhangar Blast : बंगालमधील भांगर बाँबस्फोट प्रकरणी तृणमूल काँग्रेसचा माजी आमदार शौकत मोल्ला यास अटक
नेरूळ (नवी मुंबई) येथील रुग्णालयाच्या वसतीगृहातील हिंदूंच्या देवतांच्या मूर्ती धर्मांध ख्रिस्ती युवतीने फेकून दिल्या !
शहरी नक्षलवादामुळे झारखंड येथील आदिवासींचे अस्तित्व धोक्यात !