
कोल्हापूर, ७ जुलै (वार्ता.) – गेल्या २ दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा अल्प झाल्याने पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीची वाढ अल्प गतीने होत आहे. ७ जुलै या दिवशी दुपारी १ वाजता राजाराम बंधारा येथे पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी ३२ फूट ४ इंच इतकी नोंदवली गेली. पुराचा संभाव्य धोका पहाता ‘एन्.डी.आर.एफ.’ (राष्ट्रीय आपत्ती निवारण दल) पथकाने प्रयागचिखली आणि शिरोळ येथे पहाणी केली. कोयना धरणात सध्या २० ‘टी.एम्.सी.’ (क्षमता १०५ ‘टी.एम्.सी.’) पाणीसाठा असून सांगली येथील आयर्विन पूल येथे कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी ७ फूट ६ इंच इतकी नोंदवली गेली.
मालमत्ता नोंदणीसह ‘जलमेट्रो’ला गती आणि ३१ ऑगस्टपासून विधानसभा अधिवेशन
कागल शहरातील वृक्षांची मूक हत्या थांबवा ! – हिंदु विधीज्ञ परिषदेचे कागल नगर परिषद येथे निवेदन
राज्यातील ४२३ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तेचे केले जाणार मुद्रीकरण !
थोडक्यात महत्त्वाचे (२३.०७.२०२६)
रावेत-नर्हे ‘एलिव्हेटेड कॉरिडॉर’च्या ‘डी.पी.आर्.’ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मान्यता !
संत मुक्ताई पालखीचे ७०० किलोमीटर प्रवास करून मोहोळ (जिल्हा सोलापूर) तालुक्यात आगमन !