
१. सकाम भक्ती : मूल ‘आई, आई’ म्हणत रडायला लागले की, आई द्राक्षे, बोरे, चॉकलेट इत्यादी त्याला देते. मुलाच्या हातात एखादी वस्तू पडताच मूल त्यात तल्लीन होते आणि आईला विसरून जाते. तसेच माणूस ‘भगवान, भगवान’ असा धावा करायला लागला की, भगवंत त्याच्यावर सुखाचा वर्षाव करतो आणि मग तो माणूस भगवंतालाच विसरतो.
२. दास्यभक्ती : ‘मी भगवंताचा दास आहे, म्हणजे ‘माझे’ म्हणून जे काही आहे, ते सर्व भगवंताचे आहे’, अशी वृत्ती बनली पाहिजे. दास होण्यामध्ये लाचारी नाही. दास म्हणजे ज्ञानाचे दास्य. त्यामध्ये तेज आणि आनंद आहे.
(संदर्भ : सनातननिर्मित ग्रंथ – सुगम भक्तीयोग)
वारकरी संप्रदायात संतसंगतीचे महत्त्व
मानवजातीला सद्गुरुच खरे सुख देणारे ज्ञान, शांती आणि माधुर्य देतात !
हव्यास, नावलौकिक आणि पैसा हे मानवाचे ध्येय नव्हे !
सुख आणि दुःख यांत आनंदाची धार प्रवाहित करणे, हे सद्गुरूंचे मर्म असणे
जीवनात सर्वांत मोठी प्राप्ती ईश्वरकृपा हीच होय !
‘शरणागतभाव’ येण्यासाठी प्रक्रिया राबवतांना शिकायला मिळालेली सूत्रे