सद्गुरु सत्यवान कदम रत्नागिरी जिल्ह्यातील साधकांना मार्गदर्शनासाठी संपर्क करत असतांना मला त्यांच्या सत्संगात रहाण्याची संधी लाभली. त्या वेळी मला त्यांच्या सत्संगामुळे आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

१. सद्गुरु सत्यवानदादांना ‘परम पूज्य डॉक्टर’ असेच संबोधले जाणे

माझ्याकडून सद्गुरु सत्यवानदादांना हाक मारतांना प्रत्येक वेळी ‘परम पूज्य डॉक्टर’, असेच संबोधले जायचे. त्यांच्या सत्संगात मला श्रीगुरूंचे अस्तित्व अनुभवता आले.
२. मनाची निर्विचार आणि आनंदावस्था अनुभवता येणे
सद्गुरु दादांच्या सत्संगात असतांना माझ्या मनात एकही अनावश्यक आणि नकारात्मक विचार येत नव्हता. मी सतत सकारात्मक, उत्साही आणि शिकण्याच्या स्थितीत होते. त्यामुळे ‘मनाची निर्विचार स्थिती आणि आनंदावस्था कशी असते ?’, हे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने अन् सद्गुरु दादांच्या आशीर्वादाने मला अनुभवता आले.
३. सद्गुरु दादांचे मार्गदर्शन ऐकतांना प्रत्येक वेळी ‘मी एका वेगळ्या लोकात असून प्रत्यक्ष भगवंत समोर बसून मला सांगत आहे’, या भावाने माझे अक्षरशः ध्यान लागत होते.
मला या अनुभूती आल्या. त्यासाठी मी परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सद्गुरु सत्यवान कदम यांच्या चरणी कृतज्ञ आहे.
– सौ. साधना जरळी, चिपळूण, जिल्हा रत्नागिरी. (२८.३.२०२२)
| येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
शांत, समाधानी आणि अखंड नामानुसंधानात असणार्या बडोदा (गुजरात) येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती शालिनी फाटक (वय ९१ वर्षे) !
नामजपादी उपायांचे महत्त्व आणि आश्रमात रहाण्याचे लाभ !
गुरुग्राम (हरियाणा) येथील साधिका श्रीमती प्रोमिला अग्रवाल (वय ८३ वर्षे) यांची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित
साधिकेने केलेल्या प्रार्थनेमुळे तिच्या मुलाच्या भोवती सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे दिव्य संरक्षककवच निर्माण होणे
सनातन संस्थेच्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचा छत्तीसगड राज्याचा दैवी दौरा !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या खोलीतील देवघरातील सूर्यदेवाच्या चेहर्याच्या प्रतिमेत झालेल्या पालटांची सद्गुरूंनी केलेली निरीक्षणे