स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांकडे दुर्लक्ष केल्यानेच शत्रू देश कुरापती काढत आहेत ! – नरेंद्र सुर्वे, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीच्या निमित्ताने ‘वीर सावरकर यांच्या दृष्टीने सध्याचा भारत’ या विषयावर ‘ऑनलाईन’ संवाद !

मुंबई – स्वातंत्र्यवीर सावरकर हे द्रष्टे क्रांतीकारक होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर चीन, पाकिस्तान यांसारख्या आजूबाजूच्या देशांची स्थिती पहाता भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने परराष्ट्र नीती काय असावी ? याविषयी त्यांनी सजगपणे विचार मांडले होते. देशाच्या सीमा सुरक्षित रहाण्यासाठी युवकांचे सैनिकीकरण व्हायला हवे, ही त्यांची भूमिका होती. दुर्दैवाने स्वातंत्र्यानंतर गेल्या ७४ वर्षांत शासनकर्त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या या विचारांकडे दुर्लक्ष केले.

श्री. नरेंद्र सुर्वे

परिणामस्वरूप तेजस्वी वारसा लाभलेल्या महान भारताची भूमी चीनने बळकावली आहे, तसेच पाकिस्तान आणि बांगलादेश यांसारखे छोटे शत्रू देश कुरापती काढत आहेत, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते श्री. नरेंद्र सुर्वे यांनी केले. समितीच्या वतीने आयोजित ‘वीर सावरकर यांच्या दृष्टीने सध्याचा भारत’ या ‘ऑनलाईन’ विशेष संवादात ते बोलत होते.

जातीजातींत विभागलेल्या हिंदूंना एकत्र आणले पाहिजे ! – अधिवक्ता शुभंकर अत्रे, सचिव, ‘इतिहासाच्या पाऊलखुणा’ संस्था

अधिवक्ता शुभंकर अत्रे

विदेशात जाणाऱ्या युवकांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याप्रमाणे राष्ट्रप्रेमाला प्रथम प्राधान्य दिले पाहिजे. सावरकर त्यांच्या ‘अभिनव भारत’ या क्रांतीकारी संस्थेचे कार्य वाढवण्यासाठी विदेशात गेले. विदेशात जाणाऱ्या युवकांनी मातृभूमीशी निष्ठा कायम ठेवून विद्यांचा उपयोग देशाच्या हितासाठी करावा. जातीजातींत विभागलेल्या हिंदूंना आज एकत्र आणले पाहिजे, तसेच धर्मांतरित हिंदूंच्या ‘घरवापसी’ला (हिंदु धर्मात परत आणण्याला) महत्त्व दिले पाहिजे.


हे पहा –

हिन्दू जनजागृति समिति आयोजित 🔊 विशेष संवाद
🚩 चर्चा हिन्दू राष्ट्र की…

वीर सावरकरजी की जयंती के उपलक्ष्य में…..

🚩 वीर सावरकरजी के दृष्टिकोण से वर्तमान भारत

_____________________________

राष्ट्रभक्ती, राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रनिष्ठा यांचा त्याग करणे म्हणजे राष्ट्रद्रोह ! – दुर्गेश परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते तथा लेखक

श्री. दुर्गेश परुळकर

सावरकर हे नेहमी व्यक्तीगत हिताऐवजी राष्ट्राचे हित आणि त्याची सुरक्षा यालाच सर्वोच प्राधान्य देत होते, त्यामुळे त्यांना समजणे लोकांना कठीण वाटते. ‘राष्ट्राचे हित पहाणाराच माझा मित्र आणि अहित पहाणारा हा शत्रू’, असे सावरकर म्हणायचे. युवकांनी सावरकरांमधील गुणांचा राष्ट्र उद्धारासाठी हा अभ्यास केला पाहिजे. ‘राष्ट्राचा उद्धार’, हेच ध्येय ठेवून आपण समर्पित झाले पाहिजे. राष्ट्रभक्ती, राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रनिष्ठा यांचा त्याग करणे म्हणजे राष्ट्रद्रोह आहे. स्वदेशीचे आचारण करून आपण ‘आत्मनिर्भर’ बनले पाहिजे.