
पाटलीपुत्र (बिहार) – निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेतून स्पष्ट केले की, ते कोणताही राजकीय पक्ष काढणार नाही; मात्र भविष्यात एखादा पक्ष स्थापन केलाच, तर तो सर्वांचा असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. ‘मी येत्या ३-४ मासांत राज्यातील १८ सहस्र लोकांशी संवाद साधून त्यांचे विचार जाणून घेणार आहे. जर ते माझ्या विचारांशी सहमत असतील, तर त्यांना समवेत घेईन’, असेही त्यांनी सांगितले.
Prashant Kishor to go on 3000 km padayatra in Bihar, won’t float political party for now#PrashantKishor #Bihar https://t.co/DCgbDh8Fx4
— TheNewsMinute (@thenewsminute) May 5, 2022
प्रशांत किशोर म्हणाले की,
१. बिहारमधील लोकांशी संवाद साधण्यासाठी २ ऑक्टोबरपासून मी पश्चिम चंपारणपासून ३ सहस्र किलोमीटरची पदयात्रा करणार आहे. लोकांना ‘जन स्वराज संकल्पने’शी जोडण्याचा प्रयत्न करणार आहे. मी बिहारला आश्वासन देतो की, माझ्याकडे जे काही आहे, ते मी बिहारच्या भल्यासाठी समर्पित करणार आहे.
२. बिहारमधील लालू प्रसाद यादव आणि नितीश कुमार यांच्या ३० वर्षांच्या राजवटीतही बिहार हे देशातील सर्वांत मागासलेले आणि गरीब राज्य राहिले आहे. विकासाच्या अनेक मापदंडांमध्ये बिहार अजूनही देशातील सर्वांत खालच्या क्रमांकावर आहे. बिहारला आगामी काळात आघाडीच्या राज्यांच्या सूचीमध्ये यायचे असेल, तर त्यासाठी नवा विचार आणि नव्या प्रयत्नांची आवश्यकता आहे.
अल्पवयीन मुलीची प्रसूती करून नवजात बाळाच्या विक्रीचा प्रयत्न !
झुरळ (कॉकरोच) पार्टीचे तेच ते अराजकतावादी ‘टेम्प्लेट’ (साचा)… !
‘एन्.आय.टी. गोवा’ची भरती प्रक्रिया तात्पुरती स्थगित !
‘हलाल टॅक्स’ हा हिंदूंच्या खिशातून वसूल केला जाणारा ‘जिझिया कर’च ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
गोव्यातील मटका जुगाराचे अन्वेषण करणारे विशेष अन्वेषण पथक बंद करण्यास याचिकाकर्त्याचा विरोध
सिंधुदुर्ग जिल्ह्यात शाळांमधून होणारी विद्यार्थ्यांची लूट तात्काळ थांबवा !