केशरचना करतांना स्त्रियांनी स्वत:च्या केसांचा भांग मध्यभागी पाडून त्याचा आध्यात्मिक स्तरावर लाभ करून घ्यावा !

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

स्पंदनांचा अभ्यास करण्यासाठी खालील छायाचित्रे पहावीत.

काही स्त्रिया केसांचा भांग मधोमध न पाडता तो उजव्या किंवा डाव्या बाजूला पाडतात. (छायाचित्र १) काही स्त्रिया आकर्षक केशरचनेसाठी काही अंतरापर्यंत सरळ भांग पाडतात आणि नंतर भांगाची दिशा पालटतात. (छायाचित्र २) काही वेळा केसांचा भांग व्यवस्थित आणि मधोमध न पाडल्याने तो शेवटी सरळ रेषेत न रहाता तिरका होतो. अशा प्रकारे भांग पाडून केशरचना केल्यामुळे स्त्रियांमधील रज-तम गुण वाढतात अन् स्त्रियांवर त्रासदायक (काळ्या) शक्तींचे आवरण येते. काही वेळा स्त्रिया वाईट शक्तींच्या आक्रमणालाही बळी
पडू शकतात.

हिंदु धर्माने प्राचीन काळापासून सात्त्विक केशरचना करण्यास शिकवले आहे. मधोमध भांग पाडून सात्त्विक केशरचना केलेल्या व्यक्तीला आध्यात्मिक स्तरावरील लाभ तर होतोच, याव्यतिरिक्त त्या केशरचनेतून सात्त्विक लहरी प्रक्षेपित झाल्याने ती केशरचना पहाणाऱ्याच्या मनावरही चांगला परिणाम होतोे. (छायाचित्र ३)

स्त्रियांनी केशरचना करतांना केसांचा भांग मध्यभागी पाडल्याने त्यांना आध्यात्मिक स्तरावर पुढील लाभ होऊ शकतात.

१. ईश्वरी चैतन्य ग्रहण होऊन सहस्रारावरील त्रासदायक शक्तीचे आवरण दूर होणे.

२. ईश्वरी चैतन्य ग्रहण झाल्याने कुंडलिनीचक्र जागृत होण्यास साहाय्य होणे.

३. ईश्वरी चैतन्यामुळे अंतर्मुखता निर्माण होणे.

त्यामुळे स्त्रियांनी केवळ बाह्य सौंदर्याचा विचार न करता स्वत:च्या केशरचनेचा आध्यात्मिक स्तरावर विचार करावा. ‘केसांचा भांग मध्यभागी पाडणे’, हे आध्यात्मिक उन्नतीसाठी पूरक असल्याने स्त्रियांनी केसांचा मधून भांग पाडावा. केसांचा भांग सात्त्विक स्पंदनांच्या दृष्टीने ‘मध्यभागी आणि सरळ रेषेत शेवटपर्यंत येईल’, असे पहावे.

– श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.३.२०२२)

अधिक माहितीसाठी सनातनचा ‘केशरचना कशी असावी ?’ हा ग्रंथ वाचावा.

सनातनच्या ग्रंथांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी SanatanShop.com

संपर्क : ९३२२३१५३१७

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.