
सातारा, ४ एप्रिल (वार्ता.) – छत्रपती संभाजी महाराज यांनी स्वराज्यासाठी १८९ लढाया लढल्या. स्वराज्याच्या सीमा वाढवण्यासाठी ते अविरत लढले. वयाच्या ११ व्या वर्षी त्यांना १६ भाषा अवगत होत्या. धर्मासाठी शेवटपर्यंत लढणार्या छत्रपती संभाजी महाराज यांचा चुकीचा इतिहास रंगवला गेला, अशी घणाघाती टीका ज्येष्ठ इतिहासकार सु.ग. शेवडेगुरुजी यांनी केली. संपूर्ण १ मास पाळण्यात आलेल्या बलीदान मासाचा समारोप गांधी मैदान येथून मूकपदयात्रेने करण्यात आला. या वेळी सु.ग. शेवडेगुरुजी बोलत होते. ध्येयमंत्र आणि प्रेरणामंत्र म्हणून छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले.
सु.ग. शेवडेगुरुजी म्हणाले, ‘‘छत्रपती संभाजी महाराज यांचा खरा इतिहास जनतेसमोर आणलाच गेला नाही. ज्या महिला जन्मालाच आल्या नव्हत्या, अशा महिला निर्माण करून त्यांच्याशी संभाजी महाराज यांचा संबंध जोडण्यात आला. त्यांना व्यसनी असल्याचे भासवण्यात आले.’’
‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ कायदा रहित करा ! – महाराष्ट्र मंदिर महासंघाचे ठिकठिकाणी निवेदन
थोडक्यात महत्त्वाचे : ०६.०६.२०२६
‘श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसर विकास आराखड्या’तील १३६ जागांचे सर्वेक्षण पूर्ण ! – डॉ. विजय राठोड, जिल्हाधिकारी, कोल्हापूर
हिंजवडी ‘आयटी पार्क’ मधील ‘थिंकटेक इंडिया’ आस्थापन रातोरात बंद !
आरे परिसरातील ८० एकर जागेत ५ लाख वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ !
श्री महालक्ष्मीदेवी मंदिरासह परिसरातील गड-दुर्ग यांना एकत्र करून ‘टुरिस्ट सर्किट’ करणार ! – शंभूराज देसाई, खनिजकर्ममंत्री