
१. डॉ. राजन लंबोर, माशेल, गोवा
आश्रमात अध्यात्म प्रत्यक्ष जगले जाते ! : ‘आश्रम पहाणे, हीच माझ्यासाठी एक अनुभूती आहे. एखाद्याला ‘अध्यात्म म्हणजे काय ? अध्यात्मात नेमके काय शिकावे ?’, हे जाणून घ्यायचे असेल, तर त्याने आश्रमात यावे. येथे अध्यात्म प्रत्यक्ष जगले जाते. ‘कुणीही येथे येऊन अनुभूती घ्यावी’, असे मी सर्वांना आवर्जून सांगीन.’ (२७.२.२०२२)
२. प्राध्यापक सुरिंदर कौर, रोहतक, हरियाणा
‘आश्रम हे एक छोटे जगच असून सर्व साधक समर्पणभावाने एकमेकांना साहाय्य करत आहेत ! : ‘सनातनच्या आश्रमात येण्यापूर्वी ‘इतर विश्वविद्यालयाप्रमाणेच हे एक विश्वविद्यालय असेल’, असे मला वाटले होते; मात्र येथे आल्यावर ‘हे एक छोटे जगच आहे’, असे माझ्या लक्षात आले. येथील सर्व साधकांमध्ये एकमेकांविषयी प्रेम आणि जवळीक दिसून येते. सर्व साधक समर्पणभावाने एकमेकांना साहाय्य करतात आणि नि:स्वार्थी वृत्तीने आपल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करत आहेत. येथील व्यवस्थापनही उत्कृष्ट आहे.’ (६.३.२०२२)
मुंबई येथे सनातन संस्थेने केलेल्या ‘श्री राजमातंगीदेवी महायज्ञा’च्या संदर्भात सनातन संस्थेच्या हितचिंतकांनी व्यक्त केलेले मनोगत !
सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे आणि त्यांच्या पत्नी आधुनिक वैद्या (सौ.) मधुवंती पिंगळे यांच्या सत्संगात दिग्रस (जिल्हा यवतमाळ) येथील साधिकांना आलेल्या अनुभूती !
सनातन संस्थेच्या वतीने मुंबई येथे झालेल्या ‘श्री राजमातंगी महायज्ञा’च्या वेळी साधिकेला आलेल्या अनुभूती !
बेळगाव येथील कु. सरोजा लक्ष्मण मन्नोळकर (वय १५ वर्षे) हिला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेल्यावर जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
अंतर्यामी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि त्यांची साधकांवरील प्रीती !
सात्त्विकता आणि संघटन हीच राष्ट्राच्या उत्कर्षाची गुरुकिल्ली ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी