‘२४.२.२०२२ या दिवशी मडगाव (गोवा) येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती उपदेश आनंद (वय ७८ वर्षे) यांचे निधन झाले. काही वर्षांपूर्वी काही दिवसांसाठी मी त्यांच्या घरी वास्तव्यास होते. त्या वेळी मला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.


१. श्रीमती आनंदकाकू यांना कोणतीच वस्तू वाया घालवलेली आवडत नसे.
२. प्रेमभाव
अ. त्या स्वतःच्या मुलींवर जसे प्रेम करायच्या, तसेच प्रेम त्या त्यांचे जावई श्री. सुनील मेहता यांच्यावरही करत.
आ. आम्ही त्यांच्या घरी वास्तव्याला होतो. तेव्हा त्या ‘आम्हाला सगळे मिळाले का ? काही न्यून नाही ना ?’, याकडे लक्ष देत.
३. त्यांना काही हवे असल्यास त्या शांतपणे स्वतःच घेत असत. यामागे ‘आपल्यामुळे इतरांना त्रास होऊ नये’, असा त्यांचा उद्देश असे.
४. मुलीचा आध्यात्मिक त्रास न्यून व्हावा; म्हणून तिला अधिकाधिक काळ आश्रमातच राहू देणे
त्यांची मोठी मुलगी सुश्री (कु.) दीपिकाताई हिला तीव्र आध्यात्मिक त्रास होता. अधिकाधिक काळ आश्रमात राहिल्याने तेथील चैतन्यामुळे तिला आध्यात्मिक लाभ होऊन तिचा त्रास न्यून व्हावा’, यासाठी काकू तिला आश्रमातून घरी बोलावत नसत.
‘श्रीमती आनंदकाकूंची पुढील उन्नती होवो’, अशी गुरुचरणी प्रार्थना ! माझ्या लक्षात आलेली त्यांची ही गुणवैशिष्ट्ये मी गुरुचरणी अर्पण करते.’
– रजनी नगरकर (वय ६९ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.३.२०२२)
|
भावाच्या स्तरावर प्रयत्न करून भावानंद अनुभवणार्या ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सनातनच्या सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधिका सुश्री मधुरा भोसले (वय ४३ वर्षे) !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
दैनिक ‘सनातन प्रभात’मधील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची चौकट वाचतांना श्रीराम आणि हनुमान यांच्यामधील अद्वैताच्या संदर्भात साधकाला आलेल्या अनुभूती !
गुर्वाज्ञापालनाचे महत्त्व सांगणारी एक बोधप्रद कथा !
इतरांचा विचार करणारे आणि सेवाभावी वृत्ती असलेले रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील श्री. प्रताप वंका !
साधक नामजप करत असतांना त्याला भगवान शिवाच्या अस्तित्वाची आलेली अनुभूती