‘२४.२.२०२२ या दिवशी मडगाव (गोवा) येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती उपदेश आनंद (वय ७८ वर्षे) यांचे निधन झाले. काही वर्षांपूर्वी काही दिवसांसाठी मी त्यांच्या घरी वास्तव्यास होते. त्या वेळी मला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.


१. श्रीमती आनंदकाकू यांना कोणतीच वस्तू वाया घालवलेली आवडत नसे.
२. प्रेमभाव
अ. त्या स्वतःच्या मुलींवर जसे प्रेम करायच्या, तसेच प्रेम त्या त्यांचे जावई श्री. सुनील मेहता यांच्यावरही करत.
आ. आम्ही त्यांच्या घरी वास्तव्याला होतो. तेव्हा त्या ‘आम्हाला सगळे मिळाले का ? काही न्यून नाही ना ?’, याकडे लक्ष देत.
३. त्यांना काही हवे असल्यास त्या शांतपणे स्वतःच घेत असत. यामागे ‘आपल्यामुळे इतरांना त्रास होऊ नये’, असा त्यांचा उद्देश असे.
४. मुलीचा आध्यात्मिक त्रास न्यून व्हावा; म्हणून तिला अधिकाधिक काळ आश्रमातच राहू देणे
त्यांची मोठी मुलगी सुश्री (कु.) दीपिकाताई हिला तीव्र आध्यात्मिक त्रास होता. अधिकाधिक काळ आश्रमात राहिल्याने तेथील चैतन्यामुळे तिला आध्यात्मिक लाभ होऊन तिचा त्रास न्यून व्हावा’, यासाठी काकू तिला आश्रमातून घरी बोलावत नसत.
‘श्रीमती आनंदकाकूंची पुढील उन्नती होवो’, अशी गुरुचरणी प्रार्थना ! माझ्या लक्षात आलेली त्यांची ही गुणवैशिष्ट्ये मी गुरुचरणी अर्पण करते.’
– रजनी नगरकर (वय ६९ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.३.२०२२)
|
तळमळीने धर्मप्रसार करणारे अलिबाग, रायगड येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. गिरीश सदाशिव जोशी (वय ५६ वर्षे) !
उतारवयातही स्वावलंबी, कार्यरत आणि आनंदी असलेले अलिबाग (रायगड) येथील ६६ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. गणेश महादेव आठवले (वय ९१ वर्षे) !
पू. राजाराम भाऊ नरुटे (वय ९४ वर्षे) यांच्या मागील जन्मांतील, तसेच या जन्मातील साधनाप्रवासाच्या संदर्भात सूक्ष्म-ज्ञानातून गवसलेले ज्ञानमोती !
शांत, समाधानी आणि अखंड नामानुसंधानात असणार्या बडोदा (गुजरात) येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती शालिनी फाटक (वय ९१ वर्षे) !
नामजपादी उपायांचे महत्त्व आणि आश्रमात रहाण्याचे लाभ !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !