परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे वाईट शक्तींच्या आक्रमणांपासून रक्षण होण्यासाठी सप्तर्षींनी सागितलेल्या आध्यात्मिक स्तरावरील उपायांच्या संदर्भात केलेले संशोधन

आध्यात्मिक स्तरावरील उपायांविषयी अद्वितीय संशोधन करणारे  महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

‘परात्पर गुरु डॉ. आठवले ईश्वरी राज्याच्या स्थापनेचे महान समष्टी कार्य करत आहेत. या कार्यात अडथळे आणण्यासाठी मोठ्या वाईट शक्ती परात्पर गुरु डॉ. आठवले, तसेच त्यांच्या उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा निलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्यावर सूक्ष्मातून सतत आक्रमणे करतात. सनातनच्या या तिन्ही गुरूंवर होणारी आक्रमणे नष्ट व्हावी यासाठी सप्तर्षींनी विविध आध्यात्मिक स्तरावरील उपाय करण्यास सांगितले आहेत. ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने या आध्यात्मिक स्तरावरील उपायांच्या संदर्भात विपुल संशोधन करण्यात येत आहे. यातील एक संशोधन पुढे दिले आहे.


१. सप्तर्षींनी सांगितलेले आध्यात्मिक स्तरावरील उपाय

सौ. मधुरा कर्वे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर होत असलेली वाईट शक्तींची आक्रमणे नष्ट होण्यासाठी सप्तर्षींनी पुढील उपाय करण्यास सांगितले. ‘लिंबू मधोमध चिरून त्याचे २ समभाग करावे आणि त्यांच्या आतील भागाला कुंकू लावावे. परात्पर गुरु डॉ. आठवले झोपण्यापूर्वी त्यांच्या पलंगाखाली हे समभाग पुढीलप्रमाणे ठेवावेत. लिंबाचा पहिला अर्धा भाग पलंगाच्या डाव्या पायाकडे आणि दुसरा अर्धा भाग पलंगाच्या उजव्या पायाकडे भूमीवर ठेवावा. लिंबांचा कुंकू लावलेला भाग वरच्या दिशेला करून ठेवावा. हा उपाय १ सप्ताह करावा आणि अमावास्येच्या दुसर्‍या दिवशी (९.८.२०२१ या दिवशी) वहात्या पाण्यात ती अर्धी अर्धी दोन लिंबे विसर्जन करावीत; मात्र तोपर्यंत लिंबांना स्पर्श करू नये. तसेच परात्पर गुरु डॉक्टरांची खोली झाडतांना आणि पुसतांना काळजी घ्यावी. याचप्रमाणे श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्याही पलंगाखाली वरीलप्रमाणे लिंबाचा उपाय करावा.’

सप्तर्षींनी सांगितल्यानुसार वरील आध्यात्मिक स्तरावरील उपाय करण्यात आले. हे उपाय करण्यापूर्वी (२.८.२०२१ या दिवशी) आणि उपाय केल्यानंतर (९.८.२०२१ या दिवशी) लिंबांची ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे निरीक्षणे करण्यात आली. या निरीक्षणांचे विवेचन आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.

२. निरीक्षणांचे विवेचन

२ अ. उपायांनंतर परात्पर गुरु डॉ. आठवले आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा निलेश सिंगबाळ यांच्या पलंगाखाली उपायांसाठी ठेवलेल्या लिंबांमध्ये पुष्कळ नकारात्मक ऊर्जा आढळून येणे : हे पुढील सारणीतून लक्षात येते.

२ अ १. उपायांनंतर लिंबांमध्ये पुष्कळ नकारात्मक ऊर्जा आढळून येण्याचे कारण

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे वाईट शक्तींच्या आक्रमणांपासून रक्षण व्हावे, यासाठी आध्यात्मिक स्तरावरील उपायांच्या माध्यमातून सप्तर्षींचा संकल्प कार्यरत झाला. यामुळे परात्पर गुरु डॉक्टरांवर वाईट शक्तींनी केलेल्या आक्रमणांमुळे निर्माण झालेली त्रासदायक शक्ती लिंबांमध्ये खेचली जाऊन नष्ट होण्यास आरंभ झाले. त्यामुळे उपायांनंतर लिंबांमध्ये पुष्कळ नकारात्मक ऊर्जा आढळून आली. असाच भाग श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या रक्षणासाठी केलेल्या उपायांसंदर्भातही आहे.

परात्पर गुरु डॉक्टरांच्या संशोधकवृत्तीमुळे आम्हा साधकांना ‘आध्यात्मिक स्तरावरील उपायांच्या संदर्भातील संशोधन कसे करायला हवे ?’, हे शिकायला मिळत आहे, यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (६.१.२०२२)

ई-मेल : [email protected]

वाचकांना सूचना : ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’

यू.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. रूपेश रेडकर

या लेखातील ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.