जनतेचा निर्णय नम्रपणे स्वीकारा ! – राहुल गांधी

राहुल गांधी

नवी देहली – ५ राज्यांच्या निवडणुकांत काँग्रेसचा दारूण पराभव झाल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून ट्वीट केले आहे. त्यांनी म्हटले की, जनतेचा निर्णय नम्रपणे स्वीकारा. जनादेश जिंकणार्‍यांना हार्दिक शुभेच्छा. काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांचे आणि स्वयंसेवकांचे त्यांच्या कठोर परिश्रम आणि समर्पणासाठी मी आभार मानतो. आम्ही यातून शिकू आणि भारतातील लोकांच्या हितासाठी काम करत राहू.