भारताच्या तथाकथित ‘सुधारणावादा’मुळे आध्यात्मिक क्षेत्रात होणारी हानी !

परात्पर गुरु डॉक्टरांचे समाजासाठी मार्गदर्शन !

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘स्वातंत्र्योत्तर काळात समाजधुरिणांनी समाजाला ‘अध्यात्म आणि साधना’ हे विषय शिकवलेच नाहीत. तथाकथित ‘सुधारणावादा’च्या नावाखाली त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले. लोकशाहीत कायदे सिद्ध करतांनाही याचा विचार केला गेला नाही. त्यामुळे आता एखादा लहान मुलगा त्यांच्या पूर्वजन्मीच्या साधनेच्या संस्कारामुळे या जन्मात साधना म्हणून सेवा करू लागल्यास त्याचे कौतुक होत नाही, उलट त्याच्यावर टीका होऊन तो सात्त्विक जीवही साधना न केल्याने रज-तम प्रधान होतो. अशा समाजव्यवस्थेत बालवयात साधनेसाठी देशभर भ्रमण करणार्‍या आद्य शंकराचार्य यांच्यावरही टीका झाली असती.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१४.२.२०२२)