‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

‘महाशिवरात्री हे व्रत माघ वद्य चतुर्दशी या तिथीला करतात. महाशिवरात्रीला शिवतत्त्व नेहमीपेक्षा १ सहस्र पटींनी कार्यरत असते. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवाची उपासना, अभिषेक, पूजा आणि जागरण करण्याची परंपरा आहे. महाशिवरात्रीला (२१.२.२०२० या दिवशी) सनातनच्या काही साधकांनी धामसे (गोवा) येथील पू. भय्याजी यांच्या आश्रमात शिवपिंडीवर अभिषेक केला. ‘महाशिवरात्रीला शिवपिंडीवर अभिषेक केल्याने व्यक्तीला आध्यात्मिकदृष्ट्या काय लाभ होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे एक चाचणी करण्यात आली. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.

१. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन

वाचकांना सूचना : ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’या लेखातील ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत. |
१ अ. शिवपिंडीवर अभिषेक केल्याने साधकांवर सकारात्मक परिणाम होणे : हे पुढे दिलेल्या सारणीतून लक्षात येते.

वरील सारणीतून पुढील सूत्रे लक्षात येतात.
१. अभिषेकानंतर आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकातील नकारात्मक ऊर्जा न्यून झाली.
२. अभिषेकानंतर आध्यात्मिक त्रास नसलेल्या साधकाच्या सकारात्मक ऊर्जेत वाढ झाली.
२. चाचणीतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण
२ अ. महाशिवरात्रीला शिवाची उपासना केल्यामुळे वाईट शक्तींचा दाब न्यून होणे : ‘भगवान शिव माघ वद्य चतुर्दशीला रात्रीच्या चार प्रहरांपैकी एका प्रहरी विश्रांती घेतो. (महाशिवरात्रीला शिवपूजनाची वेळ उत्तररात्री १२ ते १.३० या कालावधीत असते. हा काळ साधारण दीड घंट्याचा आहे.) महाशिवरात्रीच्या दिवशी शिवाची उपासना करण्यामागील शास्त्र पुढीलप्रमाणे आहे. ‘शिवाच्या विश्रांतीच्या वेळी शिवतत्त्वाचे कार्य थांबते, म्हणजेच त्या वेळी शिव ध्यानावस्थेतून समाधी-अवस्थेत जातो. शिवाची समाधी अवस्था म्हणजे शिवाने स्वत:साठी साधना करण्याचा काळ. त्यामुळे विश्वातील किंवा ब्रह्मांडातील तमोगुण किंवा हालाहल त्या वेळी शिवतत्त्व स्वीकारत नाही. त्यामुळे ब्रह्मांडामध्ये हालाहलाचे प्रमाण प्रचंड वाढते किंवा वाईट शक्तींचा दाब प्रचंड वाढतो. त्याचा परिणाम आपल्यावर होऊ नये म्हणून अधिकाधिक शिवतत्त्व आकृष्ट करणारी बिल्वपत्रे, पांढरी फुले, रुद्राक्षांच्या माळा शिवपिंडीवर अर्पण करतात किंवा अभिषेक करून वातावरणातील शिवतत्त्व आकृष्ट केले जाते. त्यामुळे वाईट शक्तींच्या वाढलेल्या दाबाचा परिणाम म्हणावा तितका जाणवत नाही.’ (संदर्भ : सनातनचे संकेतस्थळ – https://www.sanatan.org/mr/a/424.html)
२ आ. अभिषेकानंतर आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकातील नकारात्मक ऊर्जा न्यून होण्याचे कारण : शिवपिंडीला अभिषेक केल्यावर त्यातून प्रक्षेपित झालेले चैतन्य (शिवतत्त्व) साधकाने त्याच्या क्षमतेनुसार ग्रहण केले. त्यामुळे त्याच्या देहातील त्रासदायक शक्तीच्या स्थानातील त्रासदायक शक्ती, तसेच त्याच्या भोवतीचे त्रासदायक शक्तीचे आवरण न्यून झाले. त्यामुळे त्याच्यातील नकारात्मक ऊर्जा न्यून झाली.
२ इ. अभिषेकानंतर आध्यात्मिक त्रास नसलेल्या साधकाच्या सकारात्मक ऊर्जेत वाढ होण्याचे कारण : या साधकामध्ये नकारात्मक ऊर्जा नसून सकारात्मक ऊर्जा होती. शिवपिंडीला अभिषेक केल्यावर त्यातून प्रक्षेपित झालेले चैतन्य (शिवतत्त्व) साधकाने ग्रहण केले. त्यामुळे त्याच्या सकारात्मक ऊर्जेत वाढ झाली.’
– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (३.८.२०२०)
ई-मेल : [email protected]
|
प्रभुदेसाई कुटुंबियांनी अनुभवलेली गुरुकृपा आणि त्यांचा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती असलेला भाव !
व्यष्टी साधना गांभीर्याने करणारे म्हार्दाेळ (गोवा) येथील श्री. परशुराम प्रभुदेसाई (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७८ वर्षे) आणि सौ. पूनम प्रभुदेसाई (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७९ वर्षे) !
साधकांची आध्यात्मिक पातळी घोषित करण्याच्या सत्संगात फोंडा, गोवा येथील सौ. स्नेहा शिवदत्त नाडकर्णी यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
पू. (कै.) श्रीमती आनंदी पाटीलआजी (वय १०४ वर्षे) यांचे अंत्यदर्शन घेतांना डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील साधकांनी अनुभवलेली उच्च आध्यात्मिक स्थिती !
वर्ष २०२५ मध्ये प्रयागराज येथे झालेल्या महाकुंभपर्वाच्या कालावधीत साधिकेने भाववृद्धीसाठी केलेले प्रयत्न आणि तिला आलेल्या अनुभूती !
इतरांचा विचार करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले म्हार्दोळ, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई अन् सौ. पूनम प्रभुदेसाई !