‘फेब्रुवारी २०२१ मध्ये मला ‘माझ्या छातीत गाठ आली आहे’, असे लक्षात आले. मी आधुनिक वैद्यांकडे तपासणीसाठी गेले. त्यांनी मला ‘सोनोग्राफी’ आणि रक्ताची चाचणी करायला सांगितली. त्यांचे अहवाल आल्यानंतर आधुनिक वैद्य कोळेकर यांनी मला डेरवण, तालुका चिपळूण (जिल्हा रत्नागिरी) येथील वालावलकर रुग्णालयातील आधुनिक वैद्य देसाई यांच्याकडे पाठवले. अहवाल पाहून त्यांनी मला रुग्णालयात भरती करून घेतले. ते आम्हाला म्हणाले, ‘‘दोन दिवसांनी गाठीचे शस्त्रकर्म करूया.’’

१. शस्त्रकर्माच्या वेळी सद्गुरु सत्यवान कदम यांनी सांगितल्याप्रमाणे सतत नामजप करणे, शस्त्रकर्म झाल्यानंतर शुद्धीवर आल्यावर साधिकेला ‘नामजप चालू आहे’, असे लक्षात येणे आणि ‘ईश्वर आपली किती काळजी घेतो !’, असे वाटणे

२.३.२०२१ या दिवशी मला शस्त्रकर्म करण्यासाठी शस्त्रकर्म कक्षात नेले आणि सकाळी ७ वाजता माझे शस्त्रकर्म चालू झाले. सद्गुरु सत्यवान कदम यांनी सांगितल्याप्रमाणे मी सतत नामस्मरण करत होते. शस्त्रकर्मासाठी जवळजवळ ४ ते ५ घंटे लागले. सकाळी ११.३० वाजता मला अतिदक्षता विभागात आणले. रात्री ९ वाजता मी शुद्धीवर आले. तेव्हा ‘माझा श्रीकृष्णाचा नामजप चालू आहे’, असे माझ्या लक्षात आले. तेव्हा ‘ईश्वर आपली किती काळजी घेतो !’, असे मला वाटले. ईश्वरकृपेमुळे मला कुठलाही त्रास झाला नाही.
२. अंथरुणात फुलपाखरू झोपले असल्याचे लक्षात आल्यावर ‘ईश्वर समवेत आहे’, याची जाणीव होणे
रुग्णालयात महाशिवरात्रीच्या दिवशी माझ्या अंथरुणात फुलपाखरू येऊन झोपले होते. सकाळी परिचारिकेला माझ्या पलंगावरील चादर पालटतांना ते लक्षात आले. ती मला म्हणाली, ‘‘फुलपाखराला जवळ घेऊन झोपलीस का ?’’ तेव्हा मी तिला म्हणाले, ‘‘माझा ईश्वर (त्याच्या रूपाने) माझ्या समवेत आहे.’’ त्या फुलपाखराचा फिकट पिवळा रंग पाहून मला आनंद झाला.
३. त्यानंतर मला सनातनचे सर्व संत दिसले आणि ‘ते मला आशीर्वाद देत आहेत’, असे मला जाणवले.
मला दिलेल्या या अनुभूतीसाठी मी श्रीकृष्ण आणि प.पू. गुरुमाऊलीच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– सौ. प्रणाली मंगेश शेर्लेकर, वायरी, मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग. (२२.६.२०२१)
प्रेमळ आणि इतरांना निरपेक्षतेने साहाय्य करणारे फोंडा (गोवा) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. आत्माराम जोशी (वय ८० वर्षे) !
मनोरुग्णांची स्थिती पाहून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या ‘गुरुकृपायोगानुसार साधने’च्या अंतर्गत स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रिये’ला प्राधान्य देण्याचे साधिकेच्या लक्षात आलेले महत्त्व !
पू. शिवाजी वटकर (सनातनचे १०२ वे संत, वय ७९ वर्षे) आणि श्री. तुकाराम लोंढे (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ६० वर्षे) यांनी अनुभवलेली प्राणदाते सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची अपार कृपा !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
साधकांनो, आपत्काळातील मार्गदर्शक म्हणून ‘सनातन प्रभात’मधील साधनेच्या संदर्भातील मार्गदर्शन संग्रही ठेवा !
गुरुकार्य वृद्धींगत होण्याचा आणि साधकांना घडवण्याचा ध्यास असलेल्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये !