
१. साधिकेला घशाचा त्रास चालू होणे आणि त्या कालावधीत पू. भार्गवराम रामनाथी आश्रमात काही दिवस निवासाला येणे
‘डिसेंबर २०१९ मध्ये पू. भार्गवराम प्रभु रामनाथी आश्रमात काही दिवस कुटुंबियांच्या समवेत निवासाला आले होते. त्याच काळात मला घशाचा त्रास चालू झाला होता. मला मुळीच बोलता येत नव्हते. खाणाखुणा किंवा स्पर्श करूनच मला सांगावे लागत होते. घसा तज्ञांनी ‘बोलू नका’, असा समुपदेशही (सल्लाही) दिला होता. त्यामुळे मी अगदी आवश्यक तेवढेच हळू आवाजात बोलत होते.

२. पू. भार्गवराम यांच्या आईने ‘साधिकेचा घसा दुखत आहे’, असे सांगताच त्यांनी साधिकेची विचारपूस करणे आणि साधिकेच्या घशावरून हात फिरवणे
‘माझा घसा दुखत आहे’, हे पू. भार्गवराम यांच्या लक्षात आले. त्यांनी त्यांच्या आईला विचारले, ‘‘या अशा का बोलतात ?’’ तेव्हा त्यांच्या आईने ‘त्यांचा घसा दुखतो. त्यांना बोलता येत नाही’, असे सांगितले. ते जेव्हा जेव्हा भेटायचे, तेव्हा तेव्हा खुणेने मला विचारायचे, ‘‘आता बरे आहे का ?’’ मी नमस्कार करताच ते मला लगेच नमस्कार करत होते. एक दिवस ते मला त्यांच्या कोकणी भाषेत म्हणाले, ‘‘फाल्या (उद्या) बोलशील तू !’’ ‘संतांचे ते बोल, म्हणजे माझ्यासाठी झालेला संकल्पच आहे’, असे मला वाटले. एक दिवस त्यांनी आईने सांगताच माझ्या घशावरून हात फिरवला.
३. ‘बालक संतही निर्व्याज प्रेम करणारे आहेत’, हे लक्षात येणे
या सर्व घटनांच्या वेळी मला पुष्कळ भरून आले. आपल्या दृष्टीस तो एवढासा जीव दिसतो; परंतु त्यांना सगळे समजते. त्यातून मला त्यांच्यातील ‘प्रेमभाव, निरीक्षण, इतरांचा विचार, मोठ्यांचा आदर करणे आणि इतरांना आधार देणे’, हे गुण लक्षात आले. ‘बालक संतही निर्व्याज प्रेम करणारे आहेत’, हे माझ्या लक्षात आले. पू. भार्गवराम आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांना वंदन करून हे ४ शब्द त्यांच्या चरणी अर्पण करते.’
– रजनी नगरकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.(४.१.२०२०)
| • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
गुरुग्राम (हरियाणा) येथील साधिका श्रीमती प्रोमिला अग्रवाल (वय ८३ वर्षे) यांची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित
प्रसिद्धी पराङ्मुख आणि इतरांना साहाय्य करणारे ६५ टक्के आध्यात्मिक पातळीचे मुंबई येथील सनदी लेखापाल (चाटर्ड अकाऊंटंट) श्री. मनीष पारेख (वय ६० वर्षे) !
वयोवृद्ध असूनही स्वावलंबी आणि प्रेमळ असणार्या ६४ टक्के आध्यात्मिक पातळीच्या वापी (गुजरात) येथील श्रीमती वीरमतीबेन शुक्ल (वय ८९ वर्षे)!
स्वावलंबी आणि निरपेक्ष असलेले फोंडा (गोवा) येथील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. गजानन आळशी (वय ९३ वर्षे) !
साधिकेने केलेल्या प्रार्थनेमुळे तिच्या मुलाच्या भोवती सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे दिव्य संरक्षककवच निर्माण होणे
सर्वांपर्यंत साधना पोचवण्याची तळमळ असलेले ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे ठाणे येथील शास्त्रीय गायक श्री. प्रदीप चिटणीस (वय ६२ वर्षे) !