चर्चेविना कायदे रहित केल्याने विरोधकांकडून गदारोळ !
सभागृहात गदारोळ करणे, म्हणजे जनतेचा वेळ आणि पैसा यांचा अपव्यय करणे होय ! जनतेची झालेली ही हानी अशांकडूनच वसूल केली पाहिजे ! – संपादक

नवी देहली – संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला २९ नोव्हेंबरपासून प्रारंभ झाला. कामकाजाच्या पहिल्याच दिवशी संसदेेमध्ये केंद्र सरकारने पूर्वी संमत केलेले तीनही कृषी कायदे रहित करण्याचा प्रस्ताव संमत करण्यात आला; मात्र हा प्रस्ताव चर्चेविना संमत करण्यात आल्याने विरोधकांनी गदारोळ केला. हे कृषी कायदे रहित करण्यासाठी गेल्या वर्षभरापासून शेतकर्यांकडून आंदोलन चालू आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी हे कायदे रहित करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीतही याला संमती देण्यात आली होती.
तीनों कृषि कानून वापसी बिल लोकसभा से पास, अब राज्यसभा में होगा पेश https://t.co/ZSks6BAIqQ
— India TV Hindi (@IndiaTVHindi) November 29, 2021
काँग्रेसचे नेते आणि प्रवक्ते रणदीपसिंग सुरजेवाला यांनी ट्वीट करून म्हटले की, चर्चेविना हे तिन्ही कायदे रहित करण्यात आले आहेत. जर चर्चा झाली असती, तर उत्तर द्यावे लागले असत.’
‘इंडो-पॅसिफिक’ क्षेत्र : २१व्या शतकातील जागतिक समृद्धी आणि सुरक्षा यांची चावी !
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’