आवश्यकता भासल्यास पुन्हा कृषी कायदे बनवले जातील ! – राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्र

डावीकडे राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्र

जयपूर (राजस्थान) – केंद्र सरकारने ३ कृषी कायदे रहित करण्याची केलेली घोषणा, म्हणजे सकारात्मक दिशेने टाकलेले एक पाऊल आहे; पण सध्याची परिस्थिती अनुकूल नाही. पंतप्रधान मोदी यांचा हा निर्णय साहस आणि धाडस दर्शवतो; मात्र भविष्यात आवश्यकता भासल्यास पुन्हा एकदा कृषी कायदे बनवण्यात येतील, असे विधान राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्र यांनी केले आहे.