भारतियांना भिकेला लावणारे इंग्रज !

‘गांधीवादी लेखक धर्मपाल म्हणतात की, इंग्रजांनी पुढील प्रमुख गैरमार्गांचा अवलंब करत भारताची मोठी हानी केली. त्यांनी येथील अमूल्य अशी नैसर्गिक आणि अन्य संपत्ती लुटून नेली. त्यामुळे सामान्य माणूस भिकेला लागला, तसेच त्यांनी अनेकांना कुमार्गाला लावले. या संदर्भात वॉरन हेस्टिंग याचा लेखी पुरावा देऊन त्यांनी पुढे सांगितले, ‘‘आमची धोरणे आणि आम्ही केलेल्या कारवाया यांमुळे भारतात अंदाधुंदी माजली. त्यामुळे सैनिक आणि पोलीसही चोर अन् दरोडेखोर बनले !’’ इंग्रजांनी भारताला जाणूनबुजून कलंकित केले.’

– विश्वास पाटील (‘साप्ताहिक लोकजागर’, २८.९.२०१२)