
सावंतवाडी – शहरात झालेल्या २ वृद्ध महिलांच्या हत्येच्या प्रकरणात पसार झालेल्या एका संशयिताला पोलिसांनी ठाणे (मुंबई) येथून कह्यात घेतले आहे. यापूर्वी त्याने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता; परंतु तो वाचला. त्याच्या या कृत्यांमुळे पोलिसांचा संशय बळावला असून पुढील चौकशीत त्याच्याकडून या प्रकरणाविषयी काही माहिती मिळते का ? याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.
शहरातील उभाबाजार येथील नीलिमा नारायण खानविलकर (वय ८० वर्षे) आणि शालिनी शांताराम सावंत (वय ७५ वर्षे) या दोन महिलांची हत्या झाल्याचे ३१ ऑक्टोबरला सकाळी उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी १ नोव्हेंबरला काही संशयितांना कह्यात घेऊन चौकशी करून सोडून दिले होते. या संशयितांपैकी एकाने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता; मात्र वेळीच उपचार झाल्याने त्याची प्रकृती सुधारली होती. त्यानंतर तो युवक ९ नोव्हेंबरला सायंकाळपासून बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या पत्नीने सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिली होती. तेव्हापासून पोलीस त्या युवकाचा शोध घेत होते. त्याच्या भ्रमणभाषच्या ‘लोकेशन’वरून पोलिसांनी त्याला ठाणे येथून कह्यात घेऊन सावंतवाडी येथे आणले आहे.
Cyber Crime Coordination Center : महाराष्ट्र सायबर कार्यालय ‘सायबर गुन्हे समन्वय केंद्र’ म्हणून कार्यरत होणार !
नालासोपारा येथे ४ कोटी ८३ लाख १० सहस्र रुपयांचे अमली पदार्थ जप्त
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
उल्हासनगर येथे घरफोडी करणार्या धर्मांधाला अटक; १० लाख ९० सहस्र रुपयांचे दागिने जप्त !
Somalians Get Life Imprisonment : नौका कह्यात घेऊन खलाशांना ओलीस ठेवणार्या सोमालियाच्या ४४ नागरिकांना जन्मठेप !
Modi On Paper Leak : प्रश्नपत्रिका फुटीतील दोषींवर कठोर कारवाई केली पाहिजे ! – पंतप्रधान मोदी