|

बीजिंग (चीन) – कोरोनाचा वाढलेला संसर्ग आणि मुसळधार पाऊस यांमुळे भाज्या अन् इतर वस्तू यांच्या किमती वाढू शकतात. त्यामुळे अत्यावश्यक वस्तूंचा साठा करून ठेवा, असा आदेश चीनने त्याच्या नागरिकांना दिला आहे; मात्र चीन तैवानशी युद्ध घोषित करण्याच्या सिद्धतेत असल्याने हा आदेश देण्यात आल्याचा संशय चिनी नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. सरकारच्या आदेशामुळे अन्नधान्य, मीठ, साखर, तेल यांसारख्या वस्तूंना असलेली मागणी वाढल्याने अनेक भागांत जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला आहे. चीन आणि तैवान यांच्यात बर्याच कालावधीपासून तणावाची स्थिती असून गेल्या काही दिवसांत परिस्थिती अधिक चिघळली आहे. चीनने वारंवार तैवानला कारवाईची धमकी दिली आहे.
China urges families to store basic supplies in case of emergency https://t.co/i2HB5v3sx3
— BBC News (UK) (@BBCNews) November 2, 2021
काश्मीरमध्ये जिहादी आतंकवादी आणि भारतीय सैनिक यांच्यात चकमक : एका सैनिकाला वीरमरण
नेपाळच्या एक रुपयाच्या नाण्यावरून भारताचे भाग दाखवण्यात आलेला नकाशा हटणार नाही !
परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर व्यक्त केली चिंता !
अमेरिकेत भारतविरोधी खलिस्तान्यांना हात लावणे ठरणार गुन्हा !
Sanctions On Afghanistan : अफगाणिस्तानवरील संयुक्त राष्ट्रांच्या सध्याच्या निर्बंध व्यवस्थेवर पुनर्विचार करणे आवश्यक !
US Boys More Religious : अमेरिकेत जेन-झी मुलांचा धर्माकडे मुलींपेक्षा कल वाढला !