पंतप्रधान शेख हसिना यांना असे प्रश्न विचारावे लागतात, यावरूनच ‘त्या हिंदूंच्या रक्षणार्थ विशेष काहीच करणार नाहीत’, असेच भारताने लक्षात घ्यायला हवे आणि बांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणार्थ स्वतःहून कृती केली पाहिजे; मात्र आतापर्यंतचा अनुभव पहाता भारत असे काही करण्याची शक्यताच नाही ! – संपादक

नवी देहली – ‘लज्जा’ ही कादंबरी मी बांगलादेशातील धार्मिक हिंसाचाराच्या विरोधात लिहिली होती. २८ वर्षांपूर्वी बांगलादेशच्या तत्कालीन पंतप्रधान खालिदा झिया यांनी त्यावर बंदी घातली. जर आताच्या पंतप्रधान शेख हसिना धार्मिक हिंसेच्या विरोधात आहेत, तर त्यांनी पुस्तकावरील बंदी का उठवली नाही, असा प्रश्न या कादंबरीच्या लेखिका तस्लिमा नसरीन यांनी ट्वीट करून विचारला आहे. बांगलादेशात कुराणच्या कथित अवमानावरून धर्मांधांनी हिंदूंवर केलेल्या आक्रमणानंतर पंतप्रधान शेख हसिना यांनी ‘आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येईल’, असे म्हटले आहे. त्या पार्श्वभूमीवर नसरीन यांनी हे ट्वीट केले आहे. ‘लज्जा’ या कादंबरीत धर्मांधांकडून हिंदूंवर करण्यात आलेल्या अत्याचारांचे कथन आहे. त्यामुळे धर्मांधांनी दबाव टाकून त्यावर बांगलादेशात बंदी घालण्यास भाग पाडले, तसेच तस्लिमा नसरीन यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे नसरीन यांना बांगलादेशातून पलायन करावे लागले. त्या गेल्या २८ वर्षांपासून आजही विस्थापित म्हणून भारत आणि अन्य देश येथे वास्तव्य करत असतात.
‘Lajja’ is still relevant. pic.twitter.com/GCl9IbWrOj
— taslima nasreen (@taslimanasreen) October 18, 2021
भ्रष्ट पोलीस धर्मांध आरोपींना पाठीशी घालत आहेत ! – हिंदु संघटनांचे गंभीर आरोप
‘कॉर्पोरेट’ (व्यावसायिक) नव्हे, धर्मांतर आणि बलात्कार यांचे केंद्र !
पुणे येथे हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे धर्मांतर करण्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ !
केरळम्मधील ‘इंडियन युनियन मुस्लिम लीग’च्या पहिल्या महिला आमदाराने रेस्टॉरंटचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने केल्याने कट्टरतावाद्यांची टीका
तीर्थक्षेत्र पैठण येथे ८ नाल्यांचे दुर्गंधीयुक्त आणि रसायनमिश्रित पाणी गोदावरी नदीपात्रात !
भारतीय व्यापार्यांनी ‘हलाल अर्थव्यवस्थे’चा धोका ओळखून त्याला विरोध करणे आवश्यक !