अतीवृष्टीमुळे ‘सीईटी’ परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेची पुन्हा संधी देण्यात येणार ! – उदय सामंत, उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री

उदय सामंत

मुंबई – अतीवृष्टी आणि पूरस्थिती यांमुळे अनेक विद्यार्थी परीक्षा केंद्रांवर पोचू शकले नाहीत. यामुळे ‘सीईटी’ची परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेची पुन्हा संधी देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांची शैक्षणिक हानी होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.