‘भारतीय कानून व्यवस्था : परिवर्तन की आवश्यकता’ या विषयावर विशेष ‘ऑनलाईन’ परिसंवादाचे आयोजन !

भारतात कायदा असला तरी कायद्यातील त्रुटींमुळे गुन्हेगारांची होणारी सुटका, अनेक वर्ष निकाल न लागणे यांमुळे कायद्याचे भय राहिले नसल्याने कायदा मोडणार्‍यांची संख्याही पुष्कळ आहे. अशी न्यायव्यवस्था मोडकळीस आल्याने त्यामध्ये आता परिवर्तनाची आवश्यकता निर्माण झाली आहे. यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ७ ऑगस्ट या दिवशी ‘चर्चा हिन्दू राष्ट्र की…’ या विशेष ‘ऑनलाईन’ परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. 

वार, दिनांक आणि वेळ : शनिवार, ७ ऑगस्ट २०२१, रात्री ७ वाजता

प्रमुख वक्ते

  • अधिवक्ता अश्विनी उपाध्याय, सर्वाेच्च न्यायालय
  • अधिवक्ता अंकुर शर्मा, अध्यक्ष, इक्कजुट्ट जम्मू
  • श्री. ईश्वरप्रसाद खंडेलवाल, राष्ट्रीय अध्यक्ष, लष्कर-ए-हिंद
  • अधिवक्ता नीलेश सांगोलकर, अधिवक्ता संघटक, हिंदु विधीज्ञ परिषद

लाईव्ह पहाण्यासाठी भेट द्या !