संयुक्त राष्ट्रांत भारताची पाकचे नाव न घेता टीका !
जागतिक स्तरावर पाकचे नावही न घेणारा भारत कधीतरी पाकपुरस्कृत आतंकवाद आणि पाक यांना नष्ट करण्याचे धाडस दाखवू शकेल का ? भारताच्या अशा मुळमुळीत भूमिकेमुळे देशात गेली ३ दशके चालू असलेला जिहादी आतंकवाद नष्ट झालेला नाही, हीच वस्तूस्थिती आहे !

न्यूयॉर्क – भारत गेल्या काही दशकांपासून सीमेपलीकडून होणार्या आतंकवादाचा बळी ठरला आहे. आतंकवाद्यांचे समर्थन करणारे आणि त्यांना आश्रय देणारे देश यासाठी दोषी आहेत, अशी टीका भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकचे नाव न घेता केली.
संयुक्त राष्ट्रांमधील भारताचे स्थायी प्रतिनिधी असलेले राजदूत टी.एस्. तिरुमूर्ती यांनी ही टीका केली. ‘कोविड-१९ च्या नंतरच्या परिस्थितीमध्ये आतंकवादाच्या आर्थिक पुरवठ्याला रोखणे’ या विषयावर झालेल्या चर्चेत ते बोलत होते. ‘आतंकवादाच्या संकटाला यशस्वीपणे नष्ट करण्यासाठी आतंकवाद्यांना आर्थिक साहाय्य मिळण्यापासून रोखणे महत्त्वाचे आहे’, असेही तिरुमूर्ती यांनी सांगितले.
भारतातील घटत्या प्रजनन प्रमाणावर इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता
मंदिर विश्वस्त आणि व्यवस्थापन यांची आचारसंहिता !
चिंचवड (पुणे) येथील श्री मोरया गोसावी मंदिर परिसरातील यात्रेत ‘मेड इन पाकिस्तान’ लेबल असलेल्या चादरीची विक्री !
अवैध दारूधंदेवाल्यांची माहिती न दिल्यास संबंधित प्रशासकीय कारभार्यांचे मानधन रोखणार !
Putin Praises India : भारतीय हे जगातील सर्वांत प्रतिभावान लोकांपैकी एक आहेत ! – व्लादिमिर पुतिन, राष्ट्राध्यक्ष, रशिया
इराणच्या क्षेपणास्त्र क्षमतेची मोठ्या प्रमाणात हानी ! – Donald Trump