सातारा, ४ जून (वार्ता.) – राज्यशासनाच्या स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी विमा योजनेतून जिल्ह्यातील १२७ शेतकर्यांना २ कोटी ५४ लाख रुपये अर्थसाहाय्य देण्यात आले आहे. १२६ अपघातग्रस्त शेतकर्यांना आणि एका शेतकर्याला अपंगत्व आल्याने हे साहाय्य देण्यात आले असून चौकशी अहवाल न आल्यामुळे अद्याप १६ दावे प्रलंबित आहेत. वाहन अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचू दंश, विजेचा झटका बसणे आदी कारणांमुळे शेतकर्याचा मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास अर्थसाहाय्य प्राप्त होण्यासाठी शेतकरी विमा योजना चालू करण्यात आली आहे. या योजनेमध्ये सातारा जिल्ह्यातील ९ लाख ३ सहस्र ९०० शेतकर्यांनी सहभाग घेतला आहे. प्रत्येकी ३२ रुपयांप्रमाणे ९१ लाख ६८ सहस्र ८५३ रुपये हप्ता भरण्यात आला आहे.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > शेतकरी अपघात विमा योजनेतून अडीच कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य
शेतकरी अपघात विमा योजनेतून अडीच कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य
नूतन लेख
- सिंधुदुर्ग : सावंतवाडीत वन्यप्राण्यांसाठी पाण्याच्या कृत्रिम तळ्याची निर्मिती
- जात पडताळणी समितीकडून काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचे जात वैधता प्रमाणपत्र रहित !
- अमरावती येथील खासदार नवनीत राणा यांचा भाजपमध्ये प्रवेश !
- शवविच्छेदन अहवाल अयोग्य दिल्याने उच्च न्यायालयाकडून आधुनिक वैद्यांवर कारवाईचे आदेश
- उमेदवारी घोषित होण्यापूर्वीच लोकसभेची २ आवेदने भरली !
- मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर २ महिन्यांच्या आत कारवाई करण्याचे न्यायालयाचे निर्देश !