
सांगली, ३१ मे – सांगली जिल्ह्यात दळणवळण बंदी शिथिल करण्यात आली आहे. १ जूनपासून सर्व किराणा, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, दूध-दुग्ध पदार्थ, मिठाई, यांसह सर्व प्रकारची खाद्य दुकाने सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत चालू ठेवण्यास अनुमती देण्यात आली आहे. या दुकानांमधून घरपोच सेवा सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत देण्यास मुभा देण्यात आली आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती, फळमार्केट येथील व्यवहार, जिल्ह्यातील सर्व अधिकृत भाजीमंडई सकाळी ७ ते सकाळी ११ पर्यंत चालू ठेवण्यास अनुमती देण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापने, सार्वजनिक ठिकाणे, उपक्रम, सेवा बंद रहातील, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी निर्गमित केले आहेत.
केपे येथील नागरिकांची भूमी व्यवहारामध्ये ५६ लाखांची फसवणूक
सावंतवाडी शहरात गटारे तुंबल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर
कुर्टी, फोंडा येथील ‘सपना पार्क’ रहिवाशांचा आश्वासन देऊनही पाण्याचा प्रश्न कायम
तळोजा येथे गोवंशियांच्या मांसाची अवैध वाहतूक; धर्मांधाविरुद्ध गुन्हा नोंद
कल्याण येथे मद्यधुंद तरुणाकडून पोलीस कर्मचार्यावर जीवघेणे आक्रमण !
राजू यादव यांच्याकडून उंचगाव (जिल्हा कोल्हापूर) येथे १२० ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप !