
पणजी, २८ जानेवारी (वार्ता.) – भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी मागण्या मान्य करणार असल्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबियांनी येथील आझाद मैदानात चालू केलेले आंदोलन अखेर २८ जानेवारी या दिवशी मागे घेतले. स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबियांतील सदस्याला सरकारी नोकरी देण्याच्या मागणीवरून स्वातंत्र्यसैनिकांच्या अनेक कुटुंबियांनी २२ जानेवारीपासून आझाद मैदानात आमरण उपोषण चालू केले होते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यापूर्वी स्वातंत्र्यसैनिकांच्या २३ मुलांना फेब्रुवारीपर्यंत सरकारी नोकरी देण्याचे आश्वासन दिले आहे.
आषाढी पायी वारी पालखी सोहळ्यासाठी भवानी पेठेतील (पुणे) जागा कह्यात घेऊन इमारतीचे पाडकाम अंतिम टप्प्यात !
नांदणी (जिल्हा कोल्हापूर) येथील ‘महादेवी’च्या पुनरागमनाचा मार्ग मोकळा !
अधिक भाडे आकारणार्या ९ सहस्र १५८ खासगी ट्रॅव्हल्सवर कारवाई !
प्रत्येक महिन्याला राज्य महिला आयोगाकडे दीड सहस्रांहून अधिक तक्रारी !
मराठी भाषेच्या अशुद्ध उच्चारांविषयी विधानसभेच्या अध्यक्षांची दिलगिरी !
सिया गोयल आणि तिच्या प्रियकराला २९ जूनपर्यंत पोलीस कोठडी !