पणजी, २८ जानेवारी (वार्ता.) – भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी मागण्या मान्य करणार असल्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबियांनी येथील आझाद मैदानात चालू केलेले आंदोलन अखेर २८ जानेवारी या दिवशी मागे घेतले. स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबियांतील सदस्याला सरकारी नोकरी देण्याच्या मागणीवरून स्वातंत्र्यसैनिकांच्या अनेक कुटुंबियांनी २२ जानेवारीपासून आझाद मैदानात आमरण उपोषण चालू केले होते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यापूर्वी स्वातंत्र्यसैनिकांच्या २३ मुलांना फेब्रुवारीपर्यंत सरकारी नोकरी देण्याचे आश्वासन दिले आहे.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > गोवा > लेखी आश्वासनानंतर स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबियांचे आंदोलन अखेर मागे
लेखी आश्वासनानंतर स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबियांचे आंदोलन अखेर मागे
नूतन लेख
- रत्नागिरीत महायुतीचे उमेदवार मंत्री नारायण राणे यांनी घेतली विविध संघटना, व्यावसायिक, उद्योजक यांची भेट
- देशाला सुरक्षित आणि विकसित कोण करू शकतो ? याचा विचार करायला लावणारी ही निवडणूक ! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- शिक्षणक्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल गौरव !
- Parbhani Boycotted Voting:जिल्हाधिकार्यांनी मध्यस्थी केल्यानंतर मतदानाला आरंभ
- US Indian Student Arrest : भारतीय वंशाच्या विद्यार्थिनीला पॅलेस्टाईनसमर्थक आंदोलनात सहभागी झाल्याने अटक !
- कोकण किनारपट्टीवर पावसाळ्यात येणार्या भरतीचे दिनांक घोषित !